पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ स्वाधीन केली. बाजीरावाच्या कारकीर्दीतील पहिली दहा अकरा वर्षे ह्या यादीतील मतलब साधण्यांत गेली. १७३१ साच्या सुमाराला बाजीरावाने वरील यादीतील कलमें सर्व साधिली. येथपर्यंत ह्मणजे १७३१ पर्यंत स्वराज्यसाधनार्थ मराठ्यांच्या सर्व खटपटी झाल्या. ह्या पुढे आतां मराठ्यांच्या राजनीतीने दुसरें स्वरूप धारण केले. तें स्वरूप ह्मणजे हिंदुपदबादशाहीची स्थापना करणे हे होय. हिंदुपदबादशाहीची स्थापना करण्याची प्रस्तावना बाजीरावाने शाहूपुढे केलेली सर्वश्रुत आहेच. १७३१ पासून १७४० पर्यंत बाजीरावाची सर्व खटपट ह्याच स्थापनेच्या प्रीत्यर्थ झाली. दक्षिणेस तुंगभद्रा, उत्तरेस यमुना, पश्चिमेस समुद्र व पूर्वेस निजामुल्मुल्काचा प्रांत व पूर्वसमुद्र ह्या वाढत्या हिंदुपदबादशाहीच्या सीमा झाल्या. हे एवढें काम करून बाजीराव बल्लाळाने आपला अवतार संपविला. बाजीरावाच्या पश्चात् राज्याची धुरा बाळाजी बाजीरावाने उचलली. १७४० पासून १७५० पर्यंत बाजीरावाने जिंकिलेल्या प्रदेशांची व्यवस्था करण्यांत बाळाजीचा काळ गेला व अधून मधून काशी, प्रयाग, कटक, गढेमंडळ, बहादुरभेंडा इत्यादि प्रदेशांकडे त्याने आपली दृष्टि फेंकिली. परंतु ही दृष्टि रघोजी भोसल्याचा पाडाव करण्यापुरती व दक्षिणेत पूर्वापार चालत आलेले हक्क प्रस्थापित करण्या पुरती होती. १७५० पर्यंत मराठ्यांचे आधिपत्य सातारच्या छत्रपतींकडे होते. त्यांच्या नांवाने हिंदुपदबादशाहीचा प्रसार व स्थापना करण्याची मेहनत बाजीराव बल्लाळाने व बाळाजी बाजीरावाने केली. शाहूराजापेक्षा मुत्सद्देगिरीने व पराक्रमाने वाजीराव बल्लाळ अतिच श्रेष्ठ होता. परंतु शाहूचें आधिपत्य कमी करण्याकडे त्याचा विलकुल कल नव्हता. बाळाजी बाजीरावाला पेशवाई मिळाल्यापासून मात्र शाहूचे व त्याच्यानंतर येणाऱ्या छत्रपतींचें माहात्म्य कमी करण्याचा प्रयत्न झाला. शाहू असे तोपर्यंत बाह्यात्कारें छत्रपतीची सेवा अनन्यभावे करण्याचा बाळाजीनें बहाणा केला व तो वारल्यानंतर रामराजा गादीवर आला असता त्याची पायमल्ली बाळाजीनें मनःपूत परंतु, मोठ्या युक्तीने केली. बाळाजीच्या खऱ्या पराक्रमाला व त्याच्या मनांत घोळत असलेल्या अवाढव्य हेतूंना स्वरूप शाहूच्या मरणानंतर ह्मणजे १७५० पासून यऊ लागले. ह्या वर्षापासून बाळाजी मराठ्यांचा खरा पुढारी झाला व सातारच्या छत्रपतीचें आधिपत्य अस्तास गेले. ह्या १७५० सालापासून तो १७६१ सालापर्यंत सर्व भरतखंड महाराष्ट्रमय करून टाकण्याचा बाळाजीनें उद्योग केला. सारांश, ह्या १७५० सालापासून ब्राह्मणपदवादशाहीचा प्रारंभ झाला व हिंदुपदबादशाही हा शब्द मागे पडला. पुढील दोन विवेचनांत बाळाजीने १७५० पासून १७६१ पर्यंत बहुतेक सर्व हिंदुस्थामभर मराठयांची सत्ता प्रस्थापित कशी केली व खुद्द महाराष्ट्रांत सातारच्या छत्रपतींचे व त्यांच्या राजमंडळाचे महत्त्व कमी करून आपले महत्त्व कसें स्थापिलें ह्याचा विचार केला आहे. कारांनी एक टीप दिली आहे, तींत ही याद शाहूने बाजीराव बल्लाळाला पाठविली नसावी असा साशंक व साश्चर्य ध्वनि काढिला आहे. परंतु ही याद बाजीराव बल्लाळालाच शाहूनें पाठविली हे वरील विवेचनांत स्पष्ट केले आहे.