बादशहाकडून सरंजाम मिळाल्यानंतर बादशहाच्या हुकुमाप्रमाणे तो प्रथम
जुन्नर मागून संगमनेर व नंतर बायझापूर येथे आपल्या जहागिरीत राहिला;
व नंतर पावसाळ्यांत त्याने आपली छावणी नाशक येथें ठेविली. ( इ. सन
१६३१ ) त्यावेळी श्रीसमर्थ रामदास स्वामी पंचवर्टीत वास्तव्यास असून
स्वामींचे बारा वर्षांचें अनुष्ठान बहुतेक पूर्ण होत आलेलें होतें; अर्थात् अशा
प्रसिद्ध साधुपुरुषाची शहाजीनें या वेळी भेट घेतली असावी, असें अनुमान
करण्यास जागा राहते.
यावेळी दक्षिण प्रांतांत मोठा भयंकर दुष्काळ पडला; ( सन १६३० )
इ० सन १६२९ मध्येच पाऊस न पडल्याने ते वर्ष लोकांनी कसे तरी
कष्टानें पार पाडिलें; परंतु १६३० च्या दुष्काळानें तर लोकांच्या आपत्ती
चा कडेलोटच केला | लोकांची अन्नान्न दशा झाली ! लाखों लोकांचा
दुष्काळानें संहार उडाला ! लाखों जनावरें कालमुखी पडलीं 1 जगलेल्या
लोकांपकी पुष्कळांनी आपले प्राण जगविण्याकरितां निवडुंगेसुद्धां भक्षण
केलीं ! त्यांतच पुन्हां पटकीशी सांथ उद्भवला व त्यामुळे ही पुष्कळ लोक
अधिकान्याने पकडलें; तेव्हां खेळोजीनें निरुपायानें त्या अधिकाऱ्यास चार
लाख रुपये देऊन तिची सुटका करविली. त्यानंतर लवकरच विजापूरकर व
शहाजहान यांचा तह झाला, तेव्हां अदिलशहानें त्यास आपल्या नौकरींतून
कमी केलें; तेव्हां तो आपल्या पूर्वजांच्या वतनाच्या वेरूळ या गांवीं येऊन
राहिला, व आपले स्वतंत्र सैन्य जमवून तो आसपासच्या मोंगली प्रदेशांत
लुटालूट करूं लागला. या वेळी अवरंगझेब हा दक्षिण प्रांताचा कारभार
पहात होता; ( ता० १६ जुलई इ. सन १६३६ ते ता. २८ मे इ. सन
१६४४पर्यंत ) त्यास ही बातमी कळल्याबरोबर त्यानें मलिक हुसेन या
नांवाच्या एका सरदारास त्याच्या तपासावर पाठविले व त्यास युक्तीनें पक-
इन (६. सन १६३९ आक्टोबर ) आणून ठार मारिलें.
* बायझापूर - बैजापूर हे तालुक्याचे ठिकाण नगर जिल्ह्याच्या सर
इद्दीवरील औरंगाबाद जिल्ह्यांत, औरंगाबाद शहराच्या पश्चिमेस अजमायें
२५ मैलांवर आहे.