या वेळी म्हणजे निजामशाहाने जाधवराव वगैरे मंडळांस दग्यानें ठार.
मारिलें त्या वेळों शहाजी हा परिंडा+ येथे होता; त्यास ही दग्याची हकीगत
कळल्यावर तो अतीशय चिडीस गेला; आणि निजामशाहीशी आपला असलेला
संबंध साफ तोडून टाकून तो स्वतंत्र झाला. परिंडा येथून ताबडतोब आपल्या
सैन्यासह निघून रस्त्यांतील प्रदेशाची लुटालूट व जाळपोळ करीत तोxसंगमनेर
कन्या नामें राजसवाई उर्फ अंबिकाबाई, ही दिल्ली येथें इ० सन १६९९
मध्ये औरंगझेबाच्या मध्यस्थीनें, व त्याच्या मुलीच्या आग्रहाने शाहू राजे
यांस दिली, ती पुढे लवकरच दिल्ली येथे मृत्यू पावली.
लुकजी व त्याचा मुलगा अचलोजी यांना निजामशाहानें ठार मारल्यानंतर
अचलोजीचा मुलगा संताजी उर्फ सुजनसिंह याचें संगोपन जिजाबाईनें केलें,
छत्रपति शिवाजी याचा वडील भाऊ संभाजी व हा संताजी हे उभयतांही
बहुतेक समवयस्क असून पुढे ते दोघेही शहाजी राजे याचे जवळ कर्नाटक
प्रांती असत; व ते उभयतांही कनकगिरी काबीज करण्याच्या प्रयत्नांत असतांनाच.
मारले गेले. संताजीस संभूसिंग या नांवाचा एक मुलगा होता; तो शिवाजी
जवळ रहात असे; हा संभूसिंगही मोठा पराक्रमी निपजला, व प्रसिद्ध बाजी
प्रभू देशपांडे व संभूसिंग, या उभयतांनी मोगलार्शी युद्ध करीत राहून शिवाजी
रांगणा किल्लयांत पोहोचेपर्यंत मोठ्या मर्दपणानें खिंड अडवून धरिली. याच
संभूसिंहाचा मुलगा म्हणजे भावी काळांतील मराठ्यांचा प्रसिद्ध व पराक्रमी
सेनापति धनाजी जाधव " जयसिंग " ( जन्म इ० सन १६५० च्या
सुमारास ) हा होय.
+परिंडा हा गांव निजामच्या राज्यांत नळदुर्न जिल्ह्यांत एक तालू-
क्याचें ठिकाण असून तें अहंमदनगर जिल्हयाच्या सरहद्दीवर आहे; व येथील
किल्ला पूर्वकाळ विशेष महत्वाचा म्हणून गणला गेलेला आहे.
xसंगमनेर हे तालुक्याचे ठिकाण, अहंमदनगर जिल्ह्यांत अहंमदनगरच्या
वायव्येस भजमा ४९ मैलांवर, व दौंड मनमाड रेलवेच्या बेलापूर स्टेशन-
पासून अजमासे ३२ मैलांवर, प्रवरानदीच्या कांठी आहे, तेथून सिन्नरवरून
नाशीक, नारायण गंज ते खेडवरून पुणे, व अकोल्यावरून इगतपुरीकडे