या वेळीं मलिकंबर हा अजमार्से ऐश वर्षांचा असून त्याच्या वृद्धापकाला-
मुळें, जरी तो निजामशाही सैन्याचा मुख्य सेनापति होता तरी, युद्धाची सर्व
व त्यानें या बाईचा गौरव करून तिला " पंडिता " व " रायबागीण
( स्त्रीशार्दूल; तंजावर येथील बृहदीश्वर शिलालेखांत या शूर स्खौला
राजव्याघ्री " असे म्हटलेलें आहे. ) असे दोन किताब दिले; शाएस्ते-
खानाच्या स्वारीच्या वेळीं, या बाईनें, औरंगझेबाच्या हुकुमाने शिवाजीच्या
प्रदेशांत बराच धुमाकूळ उडविला असून, या बाईचें व शिवाजीचें इ. सन
१६७० मध्यें उमरखिंडीत युद्ध झाले असल्याबद्दल बखरींत उल्लेख आहे.
या बाईसंबंधी साग्र हककित, व या घराण्याची अधीक माहिती, पुढें
शिवाजीच्या हकीकर्तीत येणार असल्यामुळे त्या संबंधी या ठिकाणी अधीक
उल्लेख केला नाहीं.
खुलासा- वाशीम हे तालुक्याचें गांव वन्हाडांत अकोले जिल्ह्यांत अकोल्या
पासून सडकेनें अजमायें ५१ मैलावर आहे. उमरखेड हे यवतमाळ जिल्ह्यांत
पुसद तालुक्यांत आहे, व जवळच उमरखिंड आहे. जी. आय. पी. रेलवेच्या
नागपूर लाईनीवरील मूर्तिजापूरपासून यवतमाळपर्यंत जो फांटा गेला आहे,
त्यावर दारव्हा म्हणून एक स्टेशन आहे; तेथून दिग्रस, पुसद, उमरखेड व
माहूर असा रस्ता गेलेला आहे. दारव्हा येथून दिग्रस अजमार्से १८, पुढे
घुसद १८, पुढे उमरखेड २०, व तेथून निजामच्या हद्दीत २० मैलांच्या
आंतच माहूर हे ठिकाण आहे. माहूर है श्रीगुरुदेवदत्त महाराजांचें निद्रास्थान
असून तें एक तीर्थयात्रेचें, महत्वाचें प्रसिद्ध व साक्षात्कारी देवस्थान आहे.
निजामच्या राज्याची हद्द व वाडची हद्द यांच्यामध्ये उमरखिंड आहे; उमरखेड
येथें प्रसिद्ध गोचर स्वामांचा मठ असून तें व मेहकर हीं पैनगंगानदीच्या कांठी
आहेत; शिंदखेड मेहकर तालुक्यांत असून, वाशीम व मेहकर येथें श्रीबालाजी
महाराजांची प्रसिद्ध देवालयें आहेत; व हे दोन्हींहि तालुके अनुक्रमें अकोलें
व बुलढाणा जिल्ह्यांत असून तें निजामच्या राज्याच्या सरहद्दीवर आहेत;
शिरपूर हैं अकोले-वाशीम सडकेवर, अकोल्यापासून अजमायें ४५ मैलांवर
च वाशीमपासून ६ मैलांवर असून येथे अंतरिक्ष पार्श्वनाथाची मूर्ति आहे;