हिच्याशीं विजापूरकर इब्राहीम अदिलशहा याचे लग्न होण्याचे ठरलें; परंतु
मूर्तुजा निजामशहा हा त्याच्या आड आला; या वेळी मूर्तुजाशहा हा आपल्या
वजिरावर सर्व राज्यकारभार सौंपवून अवश्याच्या किल्ल्यावर ईश्वरचिंतन
करीत राहिला होता; व त्या ठिकाणी मालोजी राजे भोसले यांस त्याच्या
तैनातीस ठेविलें होतें. मूर्तुजा निजामशहा हा इब्राहीम अदिलशहाच्या लग्नाच्या
आड गेल्यानें अदिलशहानें रागाऊन आपला सरदार दिलावरखान यांस
निजामशहावर पाठविलें; व त्याप्रमाणे तो अवश्याच्या किल्ल्यावर चाल करून
आला; त्या वेळीं मालोजीनें मोठया पराक्रमानें व सफाईनें त्याला हटवून
निजामशहाचे संरक्षण केले. त्यामुळे मालोजीचे महत्व पुष्कळच वृद्धिंगत झाले;
पुढे इ० सन १५९२ मध्ये दिलावरखान हां इब्राहीम अदिलशहाला सोडून
अहमदनगर येथे येऊन निजामशहास मिळाला; व त्याच्या सल्ल्यावरून
निजामशहानें मंगळवेढ्यापर्यंत अदिलशाही प्रदेश जाळून पोळून उध्वस्त
९ स्वामींनी करार केले असे, तरी कुलबाब कुल कानु देखोल ( सह )
१० सरदेशमुखी इनाम दिल्हा आहे, तरी तुम्ही मोजे मजकुरां
११ स मुजाहिम न होणें व कोण्डे विशीं यकराज उपसर्ग न
१२ देणे जाणिजे निदेश समक्ष
( उलटून)
मर्यादे
विराजते.
x मंगळवेढे हा गांव दक्षिण महाराष्ट्रांतील सांगलीच्या राज्यांत, सोला-
पूरच्या नैर्ऋत्येस ४२, पंढरपूरच्या दक्षिणेस १६ व सांगलांच्या ईशान्येस
६५ मैलांवर आहे.