"शिवाजीनें जवांमदर्दीने नवें राज्य मेळविले आहे. तुझी
आमची दौलत संपादिली आहे. त्यांत विठोजी राजे
आमचे काका, यांचे कुटुंबांचें, व शरीफजी राजे आमचे
भाऊ, यांचे वंशाचें, तुझी वडीलपणे चालवावें; आणि
प्रजापालन करून राज्य करावें. वडील शिवाजी राजे
यांनी सर्वांचे संगोपन करून चालवावें, तरी त्यांनी
पृथ्वी आक्रमण करण्याचा इरादा धरिला, तेव्हां ईश्वर-
कृपेनें त्यांचे मनोरथ पूर्ण झाले असतां, (ते) सर्वांचें
संगोपन करावयास अधिकारीच आहेत करतील;
कदाचित् त्याजवरी समय गुदरला तरी आह्मी पादशहा-
पासून इतल्ला तोडून दौलतीचा बचाव करून घेतला
आहे. ही दौलत तुम्हां उभयतांचीं; परंतु दौलत रक्षा-
वयाकरितां तुम्ही वडीलपणे सांभाळ करावा. मुख्यार्थ
आमचे कुळ आम्ही, आमचे कुटुंबांत शिवाजी राजे
जेष्ठ; त्यांचे ठायीं तुम्ही; त्यास राजधर्म प्रवाहें तुम्ही
वडीलपणे कुटुंबीयांचा सांभाळ करणे पराक्रमी शिवाजी
राजांचे तुम्ही भाऊ, आमचे चिरंजीव, त्यांहून आवडते
विशेष आहां; तरी सर्वापासून चांगले म्हणून ध्याल,
पदरीं वडिलोपार्जित दोनचार माणसे आहेत, त्यांचे
विचारें तुम्ही चालल्यास तुमचें कल्याण आहे."
शहाजीची, व्यकोजीस आशा.