आपणाप्रमाणेच शिवाजीसही भावी काळांत भोगावें लागूं नये, म्हणून त्याच्या
स्वातंत्र्यप्रिय मनोवृत्तीस आळा घालून त्याची वाढ खुंटविण्याचाच त्यानें
कांहींसा प्रयत्न केला, अथवा त्याला तो करावा लागला. कदाचित् ओप-
चारिकहि असेल; पण असा प्रयत्न त्याने केला, हे मात्र खरें आहे. इ. सन
१६४२ ४३ मध्ये, शिवाजी कांहीं दिवस विजापूर येथे शहाजीजवळ होता;
त्यावेळी शिवाजीची स्वातंत्र्यप्रिय मनोवृत्ती, व तिला साजेल असें तेजस्वी
वजन, हीं पाहून शहाजीस अतीशय काळजी उत्पन्न झाली. त्याने पहिल्यानें
आपल्या कारभारी मंडळीकडून त्यास उपदेश करविला; आणि "आपले
वडील शहाजी राजे है सेवाधर्म पत्करून व यवनांची सेवा करून एवढ्या
वैभवास चढले आहेत; म्हणून यवनांचा द्वेष अथवा तिरस्कार करणे आपणांस
योग्य नाहीं; आपण आतो जाणते आहांत; वडिलांची अवज्ञा आपणांकडून
होऊं नये, " असे सांगविले. नंतर शहाजीनें स्वत: शिवाजीस निरनिराळ्या
प्रकारें उपदेश केला. " तुम्ही मुळे अद्याप लहान आहोत; ज्या गोष्टी
आपल्या हातच्या नाहीत त्याबद्दल विषाद मानणे, बादशहास दरबारी पद्ध-
तीनें लवून कुरनिसात न करणे, इत्यादि गोष्टी बन्या नव्हेत; आम्हांस ह्या
गोष्टी समजत नाहीत असे नाहीं; आम्ही जर असे वागलों असत तर
आम्हास हे दिवस दिसले नसते. यासाठी देशकालानुरूप वागाल तर तुमचें
कल्याण होईल; लीनतेने आर्जवपूर्वक वागाल तर राज्य तुमचें आहे; पण
मागचा पुढचा विचार न करतां चालाल तर राज्यांतून हांकलून देतील,
आणि मग पश्चात्ताप करण्याची पाळी येईल " असे त्यास बजाविलें; आणि
" आमच्याप्रमाणेच तुम्हीही त्या दरबारी आर्जवानें व नम्रपणाने वागून
आम्ही मिळविलेली दौलत पुढे चालवावी " अशी इच्छा त्याच्याजवळ प्रद-
शिंत केली; शिवाय जिजाबाईसमक्ष आपण स्वतः शिवाजीस निरनिराळ्या
प्रकारें उपदेश केला, व जिजाबाईस सांगून तिच्याकडूनही त्यास उपदेश
करविला; परंतु त्याचा कांहीही उपयोग झाला नाहीं, तेव्हां त्यानें जिजाबाई
व शिवाजी या उभयतांना पुणे येथे परत पाठवून दिले. शहाजीच्या मनांत
कांहींही असो; परंतु निदान बाह्यात्कारी तरी शिवाजीशों त्याचे वरीलप्रमाणें
वर्तन घडलें आहे. त्यामुळे या त्याच्या वर्तनावरून तो विजापूरकरांच्या
पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२४७
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२३६)