ठेवावयाचें, राज्यकर्त्याच्या मर्जीचा कल, व राजकीय परिस्थितीचा ओघ
पाहून कालप्रसंगानुसार त्या वैभवाची वृद्धी करावयाची, आणि राज्यकर्त्याची
कृपादृष्टी नेहमीं कायम राहून तें वैभव आपणांस व आपल्या भावी पिढीस
लाभत रहावें, म्हणून नेहर्मी प्रयत्न करीत रहावयाचें, हैच शहाजीच्या
उत्तरचरित्रांत त्याचें मुख्य ध्येय होऊन बसलें. " स्वतंत्र स्वराज्याचें पक्क
फळ आपण केलेल्या धक्काबुकीने यवनी सत्तेच्या वृक्षापासून तुटून अलगत
आपल्या पदरांत पडेल " ह्या शहाजीच्या अटकळीचा बोजवारा उडाल्या-
बरोबर, मांडलीकी राज्याचें कच्चें फळ तरी राजनिष्ठेनें राहून, आपल्या
पदरांत पाडून घ्या, अशी त्याची मनोवृत्ती बनली, व राजनिष्ठेच्या भारानें,
च राजकीय परिस्थितीच्या योगायोगानें तें फळ यवनी सत्तेच्या वृक्षापासून
अलगत तुटून शहाजीच्या पदरांत पडल्याबरोबर राजनिष्ठेचें आचरण, व
राज्यकर्त्यांच्या कृपेचें आच्छादन या दोन भरभकम व निर्भय आधारावर
आपल्या मांडलीकी संस्थानाची जेवढी भव्य इमारत उभारता येईल तेवढी
उभारावयाची, एवढेच एक विशिष्ठ ध्येय शहाजीच्या उत्तरचरित्नांत अखेरीस
कायम राहेिलें.
शहाजीनें " स्वराज्याचें समग्र नाटक लिहून ठेविलें होतें; इतकेंच नव्हे
तर त्याची रंगित तालीमही त्याने करून पाहिली होती; फक्त त्या नाटकाचा
महाराष्ट्राच्या रंगभूमीवर जाहीर प्रयोग व्हावयाचा होता; तो ( पुढे )
शिवाजीनें उत्कृष्ठपणें वठवून दाखविला. अहंमदनगर, विजापूर व दिल्ली,
येथील राजवर्टातून रुळलेल्या शहाजीस मुसलमानी दरबाराची खडान्खडा
माहिती होती; करोल सैन्य होतें; अकलेस मूर्त स्वरूप देणारें शौर्य होतें,
> आणि हरएक व्यक्तीस ताब्यांत ठेवण्याचे कसब होतें. महाराष्ट्र भजन पूजनांत
दंग असतां शेकडों भजनी मंडळ्या व संतमंडळ्या, यांच्या टकळीनें जें
महत्कार्य घडून येणारें नव्हतें, त्याची गुप्त तयारी मुसलमानांच्या पदरी राहून
शहाजीनें चालविली होती; स्वराज्याचा डोलारा शहाजीने तयार करून
ठेविला होता; फक्त त्याचा अनावरण समारंभ शिवाजीच्या हांतून घडाव-
याचा होता. " परंतु शहाजीनें तयार केलेला स्वराज्याचा डोलारा, हा
मांडलीकी स्वरूपाचा असल्यानें, त्या स्वराज्यांत व्यंगें होतीं; त्यांत "मांड-