( ३९ ) ठाकूर चतुरद:- यानें शहाजीच्या वर्णनपर यमकबद्ध सवायी
करण्यास जयरामास सांगितलें. शहाजीनें हात फिरंग धरली कीं, फिरंग्याच्या
( पोर्तुगीज लोकांचा ) चेहऱ्याचा रंग उतरतो, असें जयरामानें वर्णन
केले आहे.
( ४० ) लछोरामः- लछीराम म्हणजे लक्ष्मीराम; याच्या समस्येच्या
पूर्तीत शहाजीच्या कांतांचें काव्यमय वर्णन कवीने केले आहे. तीत ऐति-
हासिक भाग नाहीं.
( ४१ ) श्याम गुसाई:- याच्या समस्येच्या समाधानात शहाजीच्या
शत्रूवर व त्यांच्या बायकांवर जयरामानें कांहीं काव्यकोव्या केल्या आहेत;
ऐतिहासिक भाग नाहीं.
( ४२ ) ठाकूर शिवदासः - याच्या समस्येच्या पूर्तीत जयराम कवीनें
शहाजीच्या शत्रूच्या बायकांवर कांहीं काव्यकोट्या केल्या आहेत; ऐतिहासिक
भाग नाहीं.
( ४३ ) केहरी:- म्हणजे केसरी; याच्या समस्येच्या उत्तरांत शहाजीच्या
किर्तीचे काव्यमय वर्णन जयरामानें केले आहे. ऐतिहासिक भाग नाहीं.
(४४) नारायणभट्ट गुरूः - शहाजी जर आपल्या बाजूला मिळेल तर
आपल्याला फार जोर येईल, असे शहाजहान म्हणाला, या बाबीवर कवित्व
करण्यास नारायणभट्टाने जयरामास सांगितलें; त्याच्या उत्तरांत जयरामानें
कोटी करून, उत्तरेस शहाजहान व दक्षिणेस शहाजी हे उभयतां देशाचें
संरक्षण करीत आहेत, असे दिग्दर्शित केलें; "इत शहाजू है उत शहाजहां
है " ही तत्कालीन सर्वत्र प्रचलित असलेली म्हण जयराम कवीनें या
वेळी आपल्या काव्यांत गोंवून दिली आहे; यावरून इ० सन १६५० च्या
सुमारास शहाजीचें केवढे प्रस्थ वाढले असावें, याची कल्पना करितां येते.
त्याप्रमाणेच दुसऱ्या एका काव्यांत, “शहाजीनें एका युद्धांत आपल्या
-तरवारीनें समोर चालून आलेल्या हत्तीची सोंड उतरल्याचे वर्णन केले आहे,
त्यावरून शहाजीची हिंमत ताकद व मर्दानीबाणा, यांचे योग्य अनुमान
बांधितां येतें.
(४५) गयंद कवी:- नांव पूर्वपरिचित नाही.
पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२०६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९५ )