(२४) प्रभाकरभट्ट राजगुरू:- राजाचा वर्ष पुरोहित व राजगुरू; त्यांचें
चरणतार्थ राजा ग्रहण करीत असे; नांव पूर्वपरिचित नाहीं.
(२५) मल्लीनाथ वंशजः - रघुवंशादि महाकाव्यांवर टीका करणारा
मल्लीनाथ हा त्रिचनापल्लोचा राहाणारा, त्याचे तीन चार वंशज आश्रयार्थ
राजाकडे आले असतां, त्यांची व राजाची गांठ प्रभाकर भट्ट राजगुरू यांच्या
द्वारा जयराम कवीनें घालून दिली. नांवें कवीनें दिलों नाहीत.
( २६) भीमरायः - हा जासुांचा मुख्य होता; नांव पूर्वपरिचित
नाहीं.
( २७ ) अभेद गंगाधर:-एकोजी ( व्यंकोजी ) राजा संभाजीच्या मृत्यू.
नंतर युवराज झाला, त्याचा हा आमाल्य; उपनांव अभेद; हा वेद व्युतन
असून अग्निहोत्री असे; मनाचा दयाळू, व पापभीरु असे; त्याची जयराम
कवीवर कृपादृष्टि होती.
( २८ ) एकोजी, येकोजी ऊर्फ व्यंकोजीराजे भोसले::-शहाजी व
तुकाबाई यांचा मुलगा; संभाजी राजाच्या मृत्यूनंतर हा युवराज झाला;
याची हकीकत शहाजांच्या चरित्रांत दिली आहे.
( २९ ) कृष्णभट्ट विदूषकः - व्यंकोजी राजाच्या पदरचा खुषमस्कया;
नांव पूर्वपरिचित नाही.
( ३० ) बघेल कवी:- नांव दिलेले नाही.
( ३१ ) जनार्दन पंडित:- जनार्दन नारायण हणमंते; ह्याची चालचल-
णूक रुबाबदार असून हा शिव व विष्णू या दोन्दीं देवतांचा उपासक होता;
कर्नाटकांत शैव व वैष्णव यांचें बंड व द्वैत फार; सबब दोघांचाही मिलाफ
एकमेव अद्वितीय ब्रह्मांत म्हणजे भागवत धर्मात करणारा हा मुत्सद्दी शहाजी
व व्यंकोजो राजाच्या दरबारी होता; हें पूर्वपरिचित नांव आहे.
( ३२ ) यशवंतराव :- हा व्यंकोजी राजाचा श्रीकरणधीश; हा राज्यांतील
करवसुलीचा अधिकारी व विद्वान ब्राह्मणांचा कैवारी होता. नांव अपरिचित.
पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/२०४
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९३)