तैनातीत ठेविलेली होती; शिवाय शिवाजी हा स्वतःही नेहमीच आपल्या
आईची काळजी घेत असे; व प्रत्येक खाजगी, सामाजिक व राजकीय बाब-
तींत तो आपल्या आईच्या सल्ल्याने वागत असे, कधी कधी जिजाबाई व
शिवाजी हीं उभयतां सोंगट्याही खेळत असत. त्यांच्या पदरी पंताजी गोपी-
नाथ बोकील या नांवाचा शहाजीच्या वेळेपासूनचा एक मोठा इभ्रतदार एक-
निष्ठ व नांव लौकिकास चढलेला मुत्सद्दा होता. त्याच्यावर जिजाबाईची
विशेष मर्जी असून त्यास पंताजी काका असे म्हणत असत व जिजा
बाई व शिवाजीबरोबर त्याचा सोंगट्या खेळण्याचा अधिकार असे. याच पंताजीस
शिवाजीनें पुढें अफझलखानाकडे आपला वकील म्हणून पाठविले होतें. जिजा-
बाई ही पतिनिधनानंतर ( इ० सन १६६४, जानेवारीमध्ये शहाजीचा
मृत्यू झाला. ) अजमार्से दहा वर्षे जिवंत होती. ती शिवाजीस राज्या-
भिषेक झाल्यानंतर (शके १५९६; जेष्ठ शुद्ध १३; ता० ६ जून इ० सन
१६७४) बारा दिवसांनीच ( जन्म इ० सन१५९५ मृत्यू जेष्ठ वद्य ९ शके
१५९६; ता० १८ जून इ० सन १६७४) रायगडचे खाली पांचांड येथे
मृत्यू' पावली. त्यावेळी तिची खाजगी मिळकत पंचवीस लक्ष दोन अथवा
कांहींच्या म्हणण्याप्रमाणे अधीक, " किंमतीची होती, ती मृत्यूसमयीं
तिनें शिवाजीस दिली. जिजाबाईच्या मृत्यूमुळे शिवाजीस अत्यंत दुःख झालें,
व त्याला आपल्या मृत्यूपर्यंत जिजाबाईची नेहमी आठवण येत राहून तो
उदासीन स्थितीत राहिला. मृत्यूसमयीं जिजाबाईचें वय ७९ वर्षांचें होतें.
शहाजी हा खरोखरीच एक मोठाच वैभवशाली पुरूष होऊन गेला;
इतकेच नाहीं तर त्याच्या काळांत, इतका वैभवसंपन्न, व सत्ता आणि
अधिकारपूर्ण असा अपवादादाखल तो एकटाच पुरूष उत्पन्न झाला. शहा-
जीच्या काळांतील मुसलमानी राज्यांतील मराठा सरदार मंडळींत त्याच्या
तोडीचा दुसरा एकही अधिकारी पुरूष निर्माण झाला नाही, किंवा शहाजी-
सारखें वैभव एकासही प्राप्त झाले नाही. राधामाघव विलासचंपू+मध्ये जयराम
+ " राधामाधव विलास चंपू " या काव्याच्या कर्त्याचें नांव जयराम,
त्याच्या आईचे नांव गंगाबा, बापाचें नांव गंभीरराव, उपनाम पिंड्ये, गोत्र