शिंगणापूरच्या बडव्यासही दोनशे रुपयांचें इनाम देण्यांत आले; ते आज
तागायत त्यांच्या वंशजाकडे चालू आहे.
माता जिजाबाई ही लोकांचा स्वकीयांचा परामर्ष घेण्यांत अतीशय दक्ष असे.
सिलीमकर विठोजी हैबतराव देशमूख याची कन्या खंडेराव गोमाजी नाईक
पानसंबळ याच्या मुलास देण्याचे ठरले; त्या वेळी जिजाबाईने विठोजी देश-
मुखास खालीलप्रमाणे पत्र पाठविले; ( राजवाडे, खंड १७ लेखांक १६ )
धान करून पाटीलकीची किंमत होन १२०० पैकीं हुजुरानें हरदूजणाश
वाटून दिले होन बाराशें, बितपशील:-
९०० खंडूजी बिन म्हाकूजी भापकर होन.
३०० बरवोजी वाल्हेकर घोडा १ एकूण होन.
येणेंप्रमाणे पैकों ( वांटणीनें) देऊन पाटिलकी विकत घेऊन, राजश्री महा-
दजी निंबाळकर, आमचे जांवई यांस मौजे मजकूरची पाटिलकी करतील.
तुम्हीं त्यास राजी होऊन असणे. तालीक ( नक्कल ) लेहून घेऊन, अस्सल
नाईक (महादजी ) मशार निल्दे यांस फिरून देणे. शके १५७९ ( इ. सन
१६५७ ) हेमलंबी नाम संवत्सरे, कार्तिक शुद्ध १ मोर्तब सूद.
विशेष खुलासा:- सखूबाई ही शिवाजीचे पहिले कुटुंब सईबाई हिची
मुलगी, व संभाजीची बहीण होती. महादजी निंबाळकर ( शिवाजांचा जांवई)
हा शिवाजीच्या सैन्यांत एक प्रमुख सरदार असून संभाजसही त्याने पुष्कळ
मदत केली होती. संभाजीच्या वधानंतर अवरंगजेबानें महादजी व सखुबाई
यांस पकडून ग्वाल्हेरच्या किल्ल्यांत प्रतिबंधांत ठेविले; व त्याच ठिकाण पुढे
त्यांचा अंत झाला.
शिवाजीचा प्रसिद्ध सरनोबत नेताजी पालकर हाही असाच बाटून मुसल-
मान झाला होता; व उत्तर हिंदुस्थानांत असतो त्यानें मुर्शिदकुलीखान हें
नांव धारण केलें होतें. पुढें तो दक्षिणत परत येऊन मातोश्री जिजाबाईस
भेटला; तेव्हां तिनें कन्हाड क्षेत्रांतील ब्राह्मणांकडून त्यास शुद्ध करवून पून्हां
जातींत घेतले. या दोन उदाहरणावरूनच जिजाबाईची अलौकिक योग्यता
व दूरदृष्टी निदर्शनास येते.