रणभूमीवर शत्रू सैन्याशी झगडतांना, शेंकडों युद्धांत हजारों मानवी जीवांचा
संहार उडविण्याच्या संबईनें ज्याचें अंतःकरण वज्राहून कठीण झालेलें, तोच
शिवाजी मोहवश होऊन ह्या प्रसंगी दिङ्मूढ बनला | शिवाजीनें जिजाबाईच
घट्ट पाय घरून दुःखाने तिची नानाप्रकारें समजूत केली. दीनवाणीनें
मोठाच आकांत आरंभिला; परंतु ती साध्वी ऐकेना. यावेळी मोरोपंत पिंगळे,
निराजीपंत, दत्ताजीपंत वगैरे कारभारी मंडळी सन्निध होतो; त्यांनीही
मातुःश्रीस विनंती केली कीं, " आपण अग्निप्रवेश केल्यास महाराज प्राण
ठेवणार नाहीत; त्यामुळे बहुत कष्टानें संपादन केलेले राज्य आजच नष्ट
होण्याचा प्रसंग येईल; व शिवाजी महाराज व थोरले महाराज यांचे नांवही
मागें राहणार नाहीं. तरी ह्या गोष्टीकडे नजर देऊन महाराजास ( शिवाजीस )
ओसंगी ध्यावें. मन घट्ट करून राहावें. ( आपण ) हेका धरून सती गेला तर
वंशक्षय केला, ही अपकीर्ती जगांत होईल. " शिवाजीनेंही "तिचे मांडीवर
बसून गळां मिठी घालून, आण घालून राहविली. " "आपला पुरुषार्थ
पाहावयास कोणी नाही; तूं जाऊं नको" असे म्हणून मोठा यत्न करून
राजियांनी ( शिवाजीनें ) व सर्व थोर थोर लोकांनी राइविली; " व सर्वांच्या
आग्रहावरून जिजाबाईनें आपला सती जाण्याचा बेत रहित केला.
शिवाजीस शहाजीची निधनवार्ता कळल्यावर त्यानेही सांप्रदायाप्रमाणे
सिंहगड येथे वडिलांची उत्तरक्रिया केली; प्रीति श्राद्धादि विधि यथासांग
करून लक्षभोजने घातलीं; पुष्कळ दानघर्म केला. शहाजी बेदनूर प्रांतीं बेदि-
करें ऊर्फ बासवापट्टण जवळ तुंगभद्रेच्या कांठी अरण्यांत घोड्यावरून पडून
मृत्यु पावला; त्या ठिकाणी शिवाजीनें, पुष्कळ संपत्ति खर्च करून आपल्या
वडिलांची छत्री बांधली; तेथे पुष्कळ दानधर्म केला; या छत्रीच्या पूजेसाठीं
शिवाजीनें यरगटनहळ्ळी* हें गांव विजापूरकरांकडून मागून घेऊन तें
*यरगटन हळ्ळी हे खेडेगांव बेदिकरें या गांवाजवळच तुंगभद्रा नदीच्या कांठी
आहे. शहाजी राजा शिकारीस गेला त्या वेळी त्याचा व त्याच्या सैन्याचा तळ
यरगटनहळ्ळी येथें होता. हा गांव अदिलशहानें शिवाजीच्या मागणीप्रमाणे
१२