लेला पाहून शहाजीनेही त्याच्या नाकाडावर ठोसा चढवून दिला, आणि
कर्नाटकांतील त्याच्या इष्टेटीचा ताबा घेतला. नाटक असेच कांही वर्षे रंगत
रहावें व त्यांत आपल्याला मनाजोगतों सोंगें घेतां यावी, अशी शहाजी व
शिवाजी यांची इच्छा होती. परंतु दाराशुकोहची माशी शिंकून लढाई एक-
दम बंद झाली, व तह झाला. त्यामुळे शहाजी व शिवाजी यांना आपल्या
बेतांना निराळे स्वरूप द्यावे लागले. तहानें बेदर, कल्याणी, परांडा, निजाम-
शाही कोंकण व वांगीमहाल इतक्या प्रांताला अदिलशाही मुकली. पैकी
निजामशाही कोकण शिवाजी दाबून बसलाच होता; आणि विजापूर प्रांता-
पासून म्हैसूरच्या उत्तरेकडील तुंगभद्रेपर्यंतचा प्रांत तेवढा अदिलशहाच्या
ताब्यांत मोगलांचा मांडलीक म्हणून राहिला; व तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील
प्रांत शहाजीनें कायमचा बळकाविला होताच. महम्मदशहा मेल्यानंतर फक्त
एका वर्षांत त्याच्या दिखाऊ ऐश्वर्याचें भांडवल फुटून, अदिलशाद्दी दौर्बल्य
अगदर्दी उघडकीस आलें.” ( राजवाडे ). शहाजी विजापूर दरबारचे हुकूम
न मानतां स्वतंत्रपणे कर्नाटकमधील कारभार करूं लागला; महाराज
शहाजीराजे " या मायन्यानें, “ अमूक जहागीर ताबडतोब द्यावी; नाहीतर
आपण पादशाही खिदमत सोडून देऊं अशी धमकी दिली.
अशी घमकी देतांना, दोनचार पातशाहीत आपण नौकरी
केली, पण कोठेही आपली इज्जत कमी करून घेतली नाहीं; " असे
त्याला स्पष्ट लिहिले; आणि या " इज्जतीच्या " शद्धाला दुजोरा
ह्मणून आपण रजपूत लोक" आहो, लोक " आहो, हें उच्चवंशदर्शक वाक्य
शहाजीने अल्ली आदिलशहाच्या नजरेस आणिले; आणि आपल्या अंगीकृत
कायत खंड न पडूं देतां, आपल्या वर्चस्ववृद्धांचें कार्य सारखे चालू ठेविलें. *
*शके १५७८ मध्ये महंमद आदिलशाह मृत्यू पावल्यावर शहाजीनें त्याचा
मुलगा अल्ली आदिलशाहा यांस खालील ( इतिहासमंजरी पहा.) धमकीचे
पत्र पाठविलें तें
खान अलीशान फैरोजी निशान
अजम अकरम ममलकत मदार दवामयक बाद्दल व इजललाहु ॥ 5 ॥
अमारत व अलायत पुन्हान शुजा अत व शमामत दस्तगाह अजमत व