नंतर शहाजीची कैद, व संभाजीचा मृत्यु, हे प्रसंग तिने पाहिले; पुढे
शहाजीचा मृत्यु हाऊन वैधव्याचा खडतर प्रसंग तिच्या नशीबी आला !
शिवाजीच्या केविलवाण्या दुःखी मुद्रेकडे पाहून सहगमनाचा विचार रहित
करून ती आयुष्याचे दिवस कंठू लागली, तोच तिची सुशील व सुस्वभावी
स्नुषा, शिवाजीचें वडील कुटुंब, दुर्दैवी छत्रपति संभाजी महाराजांची माता
सईबाई तो दोन वर्षांचा असतां, मृत्यु पावली, हें दुःख तिनें पाहिलें !
संभाजीचा पितृद्रोइ तिर्ने पाहिला; युवराज संभाजी छत्रपति शिवाजीचा शत्रू
झाला, मोगलांस फितूर झाला, दुर्वृत्त झाला, समर्थ रामदासस्वामीच्या सन्निध
ठेवूनही त्याचा कांहींदी उपयोग न होतां तो विषयी व व्यसनी निघाला, हा
नशिबाचा योगायोग तिनें पाहिला ! महाराष्ट्र धर्म वाढविणारा, गोब्राह्मण
प्रतिपालक शिवाजीमहाराज, याचाच प्रत्यक्ष मुलगा, संभाजी, मोंगल सर-
दार दिलीरखानास मिळून भूपाळगडावर चाल करून आला. पिता शिवाजी
मराठाशाहीची प्राणप्रतिष्ठा करीत असतांनाच पुत्र संभाजी, त्याच मराठा-
शाहीच्या नरडीस नख देण्याचा उद्योग करूं लागला, हें दुःख तिनें अनु-
भविलें; गोब्राह्मण प्रतिपालन हॅ ज्यांचे ब्रीद त्या शिवरायाचा मुलगा संभाजी
याने एका ब्राह्मणाच्या स्त्रीशी दुर्वृत्त करण्याचा प्रयत्न केला, तिजवर बला-
त्कार केला, यामुळे त्या थोर विभूतीस झालेले दुःख दिला पाहावे लागले;
आणि आपला दुसरा प्राण असलेल्या शिवबाचा राज्याभिषेक पाहून अजमार्से
पंधरा दिवसांनी या अलौकिक स्त्रीच्या इहलोकीच्या जीवनयात्रेचा शेवट
झाला.
संभाजीचा मृत्यू झाला, त्याच वर्षी शहाजीचा प्रामाणिक, स्वामिनिष्ठ,
व मुत्सद्दी कारभारी नारो त्रिमल हणमंते हा मंगळूर येथे मृत्यू पावला; इ०
सन १६३८ पासून इ० सन १६५३ पर्यंत नारोपंत हा शहाजीच्या कर्ना-
टक मधील जहागिरीचा कारभारी होता; व त्याने त्या जहागिरीची उत्तम
व्यवस्था ठेविली होता, त्याच्या मृत्यूमुळे शहाजीस दुःख झालें; त्यास रघु-
नाथ व जनार्दन असे दोन मुलगे होते; x त्यापैकी रघुनाथपंत हा आपल्या
x नारोपंत हणमंते, हा दादोजी कोंडदेवाप्रमाणेच, मलिकंबरच्या हाता-
खाली राज्यव्यवस्थेच्या बाबतीत शिक्षण घेतलेल्या ब्राम्हण मुत्सद्यांपैकी