दोन्ही अटी मान्य केल्यासारखें करून आपली सुटका करून घेतली. याबद्दल
शिवाजीस अतीशय राग आला; X त्याला शहाजीची ही धरसोड व तज्जन्य
मानहानी बिलकूल पसंत पडली नाहीं; तथापि तो पितृभक्त असल्याने त्यानें
वडिलांस ( शहाजीस ) एक शब्दानेंही दुखविले नाहीं; परंतु शहाजीचे
घोरण कसे चुकलें याचें मनन करून त्या चुका आपल्या हौतून घडूं नयेत म्हणून
शिवाजीनें पूर्ण खबरदारी घेतली; व तीच त्याच्या स्वतंत्र स्वराज्य संस्थाप-
नेच्या कार्याला पुष्कळ वेळां प्रमुखत्वानें मार्गदर्शक ठरली.
xपरमानंद कवीकृत "शिवभारत" या काव्यपंथाच्या सोळाव्या
अध्यायत, ( इतिहास मंजरी, भाग १ पहा.) अर्से वर्णन केलेलें आहे कीं,
शके १५७१ मध्ये, शहाजीस कैदेतून सोडतांना विजापूर दरबारानें (१)
संभाजीनें बेंगरूळ सोडावें, आणि (२) शिवाजीनें सिंहगड सोडावा, अशा
दोन मानहानीकारक अटी घातल्या; व त्या शहाजीनें मान्य करून प्रतिबंधांतून
• आपली मुक्तता करून घेतली; वास्तवीक पाहतां संभाजीनें फरादखानाचा
परराभव करून, व शिवाजीनें मुसेखान व फत्तेखान यांनां धुळीस मिळवून, (व
अदिलशहास मोंगली बादशाही शह देऊन ) शहाजीच्या मुक्ततेची तजवीज
केली होती; परंतु महंमद अदिलशहाच्या उपरीनिर्दिष्ट दोन्हीही आपमानकारक
अटी शहाजीनें मान्य करून आपली सुटका करून घेतली; हे ऐकून शिवाजीस
अतीशय राग आला, व त्याने आपल्या वडिलांचे धोरण कसे चुकत आहे, वडिलांनी
मुसलमानी राज्यकर्त्यांची नौकरी इमाने इतबारें केली, आपला सर्व जन्म
त्यांच्या सेवेत घालविला, तरी त्यांच्या हातून म्हणण्याजोगी महत्वाची काम-
गिरी झाली नाहीं, उलट दुटप्पी वर्तनामुळे त्यांच्यावर कैदेचा मात्र प्रसंग आला,
तेव्हां यवनांच्या नौकरीत महत्व प्राप्तकरून घेण्याचा प्रयत्न किती व्यर्थ आहे,
यासंबंधी आपले विचार आपला वृद्ध मुत्सद्दि सोनाजी पंडित ( सोनोपंत
डबीर) यांजजवळ बोलून दाखविले, व विजापूरकरावर स्वारी करण्याचा
निश्चय केला; त्यावेळी सोनाजीपंतांनी खरी राजनीति कोणती हे सांगून त्याचा
राग शांत केला; यासंबंधी तंजाउरचा शिलालेख पृष्ठ २४ ( बृहदीश्वर शिला-
लेख) मधील उतारा, व इतर विवेचन पुढें चवथ्या परिच्छेदांत " शहाजीची.
योग्यता " या सदराखाली केलेले आहे.