न्याने अदिलशहाविरुद्ध जाहीररीत्या शस्त्र उगारलें होतें. त्याचा मांडलीक
बदनूरकर शिवाप्पा नायक याची त्याला मदत होती; त्यानें भारी फौज
जमविलेली होती; तो जय्यत तयारीत होता; बेदनूरच्या डोंगराळ प्रदेशाचा
आश्रय घेऊन त्याने आजूबाजूच्या आदिलशाही प्रदेशांत मोठाच धुमाकूळ
उडवून दिला होता आणि अदिलशाही सैन्याशी झालेल्या कित्येक लहान मोठ्या
चकमकीत त्यांनी त्या सैन्याचा पराभव केला होता; त्यामुळे त्या उभयतांना
नामशेष करण्याच्या दर्शनी उद्देशानें महंमदशहा यानें मुस्तफाखानाची कर्नाटक
प्रांती रवानगी केली; व शहाजी, आसदखान, व विजयानगरकर श्रीरंगनायक
याच्या ताब्यांतील गंडीकोट + ह्या किल्लयास वेढा देऊन बसलेला अदिलशाही
सरदार सिद्दी रैदान यांना मुस्तफाखानास जाऊन मिळविण्याविषयीं हुकूम
‘पाठविले; त्याप्रमाणें हे तीन्हींही सरदार आपआपल्या सैन्यासह मुस्तफाखानास
येऊन मिळाले; व उमयतांमधील युद्ध जोरात येण्यास सुरुवात होऊन येल्लूर X
येथे एक मोठेंच निकराचें युद्ध झाले; ( इ. सन १६४७). त्यावेळी मुस्तफा
खानाचे सैन्य मध्यभाग, व त्याच्या उजव्या बाजूस सिद्दी रेहान व डाव्या
बाजूस शहाजी व आसदखान हे होते; बेदनूरकराकडील सरदार दामलवाड
यानें मध्यभागी असलेल्या मुस्तफाखानाच्या सैन्यावर मोठ्या निकराचा हल्ला
करून त्याचे खास लष्कर फोडून भन केलें, व शहाजी व आसदखान यांच्या
सैन्यावर चाल करून जाऊन आसदखानासही जखमी केलें आणि त्यावेळी
मुस्तफा खान हा युद्धभूमीपासून जवळच एका टेकडीवरून हा युद्धचमत्कार
+ गंडीकोटा, गंडीकोट, ऊर्फ गंजीकोटचा डोंगरी किल्ला मद्रास इलाख्यां-
तील कडाप्पा जिल्ह्यांत येर्रा मलईच्या डोंगरांत ( Yerramalai moun-
tains ) असून, तो समुद्रसपाटीपासून १७६० फूट उंचीवर असून, पूर्वकाळी
तो विशेष मजबूत म्हणून त्याची प्रसिद्धी आहे.
x येल्लूर ऊर्फ एल्लूर, एल्लोर ( Ellore ) है गोदावरी जिल्ह्यांत हल्ली
एक तालुक्याचे ठिकाण असून, ते राजमहेंद्रीपासून ५५ मेलांवर ताम्मालेर
नदीच्या कांठी आहे; व तेथें गांवानजीकच एक किल्ला असून तो हल्लीं मोड-
कळीस आलेला आहे.