-मंदिर स्थापण्यासाठी, दोन लक्ष सुवर्णमुद्रा बेऊन शिवाय वार्षिक देणगी पद्मास
इजार दिनारांची दिली होती; एखाया अंमिराच्या मुलापासून तो तहत एखाद्या
मजुराच्या मुलापर्यंत सर्वांना सारखे शिक्षण मिळत होतें, व अशा रीतीने सहा
हजार विद्यार्थ्यांना विद्यादान दिले जात होतें. गरीब विद्यार्थ्यांसाठी छात्रवृत्ति
ठेविल्या असून, शिक्षकांनाही आपले गुण व श्रम यांच्या प्रमाणाने वेतन दिले
जात होते. इजिप्सच्या बादशाही ग्रंथालयांत उत्कृष्ट लिहिलेले व सुंदर बांधणीचे,
असे एक लक्ष ग्रंथ असून केरो येथील विद्यार्थ्यांना त्याचा फार उपयोग
होता; परंतु स्पेनमधील उमरावांनी स्थापन केलेल्या ग्रंथालयापेक्षा, हा संग्रह
लहान बाटेल; कारण त्या संग्रहालयांत सहा लक्ष ग्रंथ असून, त्यापैकी ४४
ग्रंथ, संग्रहालयांतील ग्रंथाच्या सुची अथवा याद्या होत्या, त्यांची राजधानी कार-
डोवा (उर्फ काढा) व आसपासच्या शहरों ३०० वर ग्रंथकार निर्माण झाले;
व एडॉलुसिमन राज्यांत सत्तर ठिकाणी ग्रंथालयें उषडली गेलीं; युरोपांत कृष्ण
युग सुरू होईपर्यंत म्हणजे सुमारें पांचरों वर्षापर्यंत सारखा अरबी विचा
प्रसार होत होता. ::
"आतां आपण हिंदुस्थानांतील मुसलमानाकडे बळू या ! महंमद गझ-
नबीनें हिंदुस्थानावर स्वाऱ्यावर स्वाऱ्या करून सोमनाथापर्यंत प्रदेश आक्रमण
केला, व अलोट संपत्ति लुटून नेली. अल्लाउद्दीन ने हिंदुस्थानात मोडमोंट, विजय
संपादन केले, अथवा शिकंदरलोदी याचा राज्यकारभार अत्यंत मुखकर होता,
या गोष्टींचे वर्णन दिले नाहीं. तरी त्यांचा उल्लेख हा केलाच पाहिजे. तैमूरच्या
मॉगल घराण्या पर्यंत आलो म्हणजे मात्र एकापेक्षा एक विलक्षण
राज्यकर्ते दिसतात. मिस्तर सिडने ओवेन हा आपल्या "India on the ers of
Britlish Conquest" ह्या पुस्तकांत लिहितां:-" या मोगल घराण्यांत एकापेक्षा
एक बरचढ असे कागोपाठ सहा राज पुरूष होऊन गेले. त्यातील पहिला मोगल-
साम्राज्य संस्थापक बबर, ( आणि ) तिसरा अकचर, यानें तर साम्राज्याचा पुन-
रुद्धार करून त्याचा विस्तार केला; व त्याने अशी युद्धे केली की त्यांची तुलना
चार्लस धिग्रेट याच्याशीं करिता येईल, शिवाय त्याने लष्करी पद्धतींत ही पुन-
र्रचना केली. सहावा बादशहा आलमगीर, हा आपल्या तरुणपणा पासूनच मोठा
लढवय्या असून आपल्या आयुष्याची शेवटची तेवीस वर्षे एका दीर्घ कालीन
युद्धांत घालवून युद्धाचा ॲक्ट न होतांच, जर्जर होऊन आपल्या वयाच्या ८६