पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/99

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
     प्रकरण तिसरें.     ९७

आहे, तरी सूर्य उगवला, सूर्य कासराभर वर आला, इत्यादि प्रयोग करण्यास काही हरकत नाही. वास्तविक पाहतां सूर्य कासराभर वर येत नाही तर पृथ्वी उलट दिशेनें कासराभर खाली जाते. तथापि सूर्य कासराभर वर आला हाच प्रयोग प्रचारांत राहील. त्याच प्रमाणे साळूबाईच्या पंचपाळ्यास सहा पाळी असली व झिंगूबाईच्या पंचपळ्यास सात पाळी असली तर झिंगूबाईने साळूबाईस तुच्छ मानावयास कांहीं हरकत नाहीं; किंवा बकूबाईने आपला चौफुला सात फुलांचा करण्यास सोनारास सांगितले तरी सोनारास हांसण्याचे कांहीं कारण नाहीं. तसेच तीन महिन्यांनी प्रसवलेल्या साठक्या साळी मोठ्या रुचकर लागतात, अशा कोंकणी शेतकऱ्यांनी खुशाल बढाई मिरवावी. लहान मुलांस सोमवार, मंगळवार, इत्यादि वारांची नांवें सांगून शेवटीं " आठवड्याचे दिवस सात " असे सांगून पंतोजी बाबांनी हे मुलांस घोकावयास लावलें तर त्या पंतोजी बाबांनीं कांहीं चुकी केली असे होत नाहीं; तसेच एकाद्या गवळ्याने सोनूबाईस पंधरवडाभर दुधाचा रतीब घातला तर सोनूबाईकडून त्यास चवदा दिवसांचे पैसे मिळाले तर आपण फसलों असें गवळ्यास वाटावयाचे कारण नाही. फौजदारी खटल्यांत दोन किंवा तीन पंच नेमले जातात. आपल्या आलीकडच्या पंचांगांत पांच त्रिक अंगे असतात. तेलंगी लोक पांच जानव्यांचा एक जोडा करितात वर निर्दिष्ट केलेले अशुद्ध शब्द व अशुद्ध प्रयोग भाषेमध्ये पाळे मुळे घालून स्थैर्य पावले आहेत, त्यांना स्थानभ्रष्ट करितां यावयाचें नाहीं व करणे इष्टही नाही. आम्हीं वर्गामध्ये एकदां मराठी कविता स्पष्ट करून सांगत असतां एका कवितेत " पीतांबर " हा शब्द आला होता. आम्ही मुलांस विचारले “ तुम्हीं कधीं पीतांबर