पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/101

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



     प्रकरण तिसरें.     ९९

म्हणजे त्यांचेवर मनुष्याची इच्छा चालू शकत नाहीं. ते भाषेच्या नियमांनी चालतात, मनुष्यकृत नियमांनी चालत नाहींत.

 एकाद्या मनुष्याच्या शरीराचे कांहीं भाग बोजड व बेडौल असले तर कधी कोणी ते कापून टाकावे अशी शिफारस करीत नाही. कारण ते भाग त्याच्या जीवच्छरीराचे कायमचे भाग असल्या कारणाने त्यांना धक्का देणे म्हणजे साच्या शरीरास धक्का पचविण्याप्रमाणे होईल. शरीराच्या व्यापारास ते भाग सर्वथैव पात्र असतात व त्यांच्या अस्तित्वावर शरीराचे जीवित कमजास्त मानाने अवलंबून असते. त्या प्रमाणेच भाषेमध्ये जरी कांहीं असत्यमूलक शब्द असले तरी ते त्या भाषेच्या जीवितास आवश्यक असतात व भाषा जर ठार मारून टाकावयाची नसेल तर त्यांस अर्धचंद्र देण्याचा प्रयत्न सिद्धीस जावयाचा नाही. तेव्हां एकंदरीत सांगावयाचे म्हणून एवढेच की शुद्धाशुद्धपणाचा वृथाभिमान बाळगून " तांबडा पीतांबर" "लाल शाई" वगैरे प्रमाणे असत्यमूलक किंवा विरोधगर्भ शब्दांस भाषामंदिरांतून अर्धचंद्र प्रदानाने बाहेर काढण्याचा प्रयत्न कोणी पंडिताने केला तर तो वायां जाऊन तो लोकांच्या उपहासास मात्र पात्र होईल. असत्यमूलक शब्दांचा उच्छेद करणे जसे शक्य नाही तसेच ते इष्टही नाहीं. तेणेकरून आपण अनवस्थाप्रसंगाच्या दोषास पात्र होऊ. असत्यमूलक शब्दांचा उच्छेद करावयाचा असे एकदा आपण ठरविलें म्हणजे भाषेच्या स्थैर्याचा एक महत्त्वाचा आधारस्तंभच नाहीसा होईल.

 मनुष्य प्राणी सर्वज्ञ नाहीं व सर्वज्ञ कधीच व्हावयाचा नाहीं. अनंत शास्त्रांचे व अनंत वस्तूचे ज्ञान मनुष्य कसा मिळवू शकेल? तसेच मनुष्याने जे ज्ञान संपादिले आहे ते तरी