पान:मराठी रंगभुमी.djvu/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
७७
भाग १ ला.


मानी अमदानीच्या अगदी शेवटच्या कालांतलें आहे. दामाजीपंत हा मंगळवेढयांतला एक ब्राम्हण जातीचा इसम असून आपल्या आंगच्या गुणांनी बेदरच्या यवन बादशहास तो कसा प्रिय झाला होता, सरकार दरबारची वसूल वगैरे करण्याची कामें त्याच्याकडे कशा रीतीने सोपविली होती, त्या वेळी दुष्काळ किती कडक पडला होता, लोकस्थिति कशी होती, दुष्काळांत आपल्या संग्रही असलेली धान्याची कोठारें बाद- शहाच्या परवानगीशिवाय त्याने कशी लटविली, बादशहास हे वर्तमान कळतांच त्याचा रोष कोणत्या प्रकार झाला व दामाजीपंतास शिक्षा देण्याचे त्याने कसे ठरावल, पुढे दामाजीपंतानें खर्चलेले धान्य व द्रव्य पाचा भरपाई होऊन बादशहाचा रोष कसा कमी झाला जापतावर बादशहाची पनः मर्जी कशी बसली वगैरे गोष्टींचा ऐतिहासिक दृष्टया विचार करून त्यावर एखादं रसभारत नाटक लिहिण्याचा व त्याचा प्रयोग "पाचा आजपर्यंत कोणी प्रयत्न केला नाही. हा प्रयत्न समास मराठी रंगभूमीस विशेष शोभा येणार आहे.
 ' शाकरदिग्जय ' नांवाचे एक नाटक कै० आण्णालास्कर यांनी रचले असून त्याचे प्रयोग कोल्हापुरकर नाटककमंडळी करीत असे. या नाटकांत श्रीमच्छंकराचारर्यानीं व्दैतमताचे खंडन करून अद्वैतमार्ग प्रस्थापित केला हा इतिहासाचा मुख्य विषय संविधानकास