जो विशेष रंग चढत असे त्याचें कारण त्यांच्या जोडीदार पात्रांचा अभिनय हे होय. बखले ह्मणून एक इसम होते ते यांच्या मंडळींत स्त्रीवेष घेत असत; व रा. केशवराव आठवले, सदाशिवराव बापट, गोविंदराव शाहाणे, बळवंतराव भोवळकर, सरदेसाई वगैरे इसम इतर भूमिका घेणारे होते. या मंडळीचे जनरल म्यानेजर रा. बळवंतराव पारखे हे असून त्यांच्या अविश्रांत श्रमानेच या मंडळीची सर्व व्यवस्था बिनबोभाट होत असे. वरील चार नाटकांत 'अथेल्लो' हे या मंडळीचे हातखंडे नाटक होते. याचा पहिला प्रयोग जेव्हां आनंदोद्भव थिएटरमध्ये झाला तेव्हां ज्यांना ज्यांना तो पाहण्यास जाण्याची सवड मिळाली नाही त्यांना त्यांना मोठे वाईट वाटलें; व रा. केरो लक्ष्मण छत्रे, शिवराम हरी साठे, बाबा गोखले वगैरेंच्या मध्यस्थीने 'फिरून हा खेळ करून दाखवावा' ह्मणून मंडळीस वर्तमानपत्रांतून विनंति केली. तसेंच या खेळाची तारीफ ऐकून मुंबईच्या लोकांनीही यांस पाचारण केलें, व तेथेही आपले प्रयोग करून या मंडळीने नांव मिळविले. असो; तर या मंडळींचा पहिला उद्देश जो 'नाट्यकलेत सुधारणा करून लोकांस नवी अभिरुची लावावयाची' तो पुष्कळ अंशानें सफल झाला; एवढेच नव्हे तर, बुकिश नाटके करणाऱ्या कंपन्यांस 'आर्योद्धारक मंडळी' ही मार्गदर्शक होऊन, त्यांत पुढे ज्या सुधारणा झाल्या त्याचे सर्व श्रेय या मंडळी
पान:मराठी रंगभुमी.djvu/64
Appearance