केल्या. रागाचा मिश्र प्रकार कमी करून व वर्जावार्ज सुरांकडे विशेष लक्ष ठेवून त्यांनीं आपलीं पद्ये होतील तितक्या शुद्ध गवयी पद्धतीनें पात्रांना शिकविलीं; व पात्राचें गाणें आपल्या पसंतीस उतरल्याशिवाय सहसा त्या पात्राला ते रंगभूमीवर आणीत नसत. ही कंपनी ' द्यूतविनोद,' 'रासोत्सव, 'द्मयंती' वगेरे अनेक नाटकें करीत असे. पण तिचें हातखंडा असें नाटक म्हटलें म्हणजे 'द्यूतविनोद' हेंच होय. हें नाटक पौराणिक कथाभागावर राचिलें असून त्यांत पतिव्रता स्त्रिया आपल्या पतीची मनधरणी कशी करतात हें दाखविलें आहे. यांत शंकर, पार्वती, शिवगण, नारद, वनचर, इ. पात्रें आहेत. यांच्या नाटकांत शंकराचें काम करणारे रा. चिंतोबा गुरव या नांवाचे इसम असून पार्वतीची भूमिका रा. विनोबा गुरव हे घेत असत. या दोघांचा अक्ष खेळतेवेळीं होत असलेला विनोदाचा संवाद, मध्येंच नारद येऊन त्यानें पण लावण्याविषयीं आग्रह केल्यामुळे दोघांत कलह उत्पन्न होऊन शंकरास आलेला राग, व त्या रागांत पार्वतीचा त्याग करून त्यानें वनाचा केलेला आश्रय,व पुढें पार्वतीनें भिलिणीचा वेष घेऊन सख्यांसह आपल्या गाण्यानें शंकरास मोहित करून त्याला वश करून घेणें इ. प्रसंग या नाटकांत फार नामी असून त्या त्या वेळचीं पद्येही सरस आणि बहारीचीं आहेत; व वरील दोन्ही पात्रे उत्कृष्ट काम
पान:मराठी रंगभुमी.djvu/141
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२३
भाग २ रा.
