पान:मराठी रंगभुमी.djvu/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९५
भाग २ रा.


भाषांतर करतांना बहुतेक श्लोकांच्या ठिकाणीं पद्य आणि गद्याच्या ठिकाणीं गद्यच ठेविलें आहे. आतां तालसुरावरील रागबद्ध पद्ये घालतांना आपल्या नाटकांतील पात्रांचा त्यांनीं विशेष विचार केला असावा असें दिसतें; व पात्रांचा आवाज आणि ह्मणण्याची तन्हा याला अनुसरूनच त्यांनीं बहुतेक पद्ये घातलीं आहेत. ह्मणजे दुष्यंताचें काम करणारे मोरोबा वाघुलीकर, तेव्हां त्यांना लावणीच्या धतींवर ह्मणतां येतील अशीं पुष्कळ पद्ये घातलीं आहात; व नाटेकर गवयी ढंगानें गाणार तेव्हां त्यांना त्याप्रमाणेंच पद्ये ठेविलीं आहेत. आण्णा स्वत: कण्वाचें काम करीत, तेव्हां आपणास ह्मणतां येतील अशीं त्यांनीं वेगळीं पद्ये केलीं हेोतीं व तीं शाकुंतल नाटकाच्या पुस्तकांत अखेरीस छापलींही आहेत.
 आरंभीं आण्णांनीं शाकुंतल नाटकाचे चारंच अंक बसवून त्याचा प्रयोग केला, व पुटें तें साग्र असविलें. आतांप्रमाणें त्या वेळीं सुरांची भरती करण्यासमेंटी नसल्यामुळे तंबुरे आणि सारंग्या लावून सुरांची भरती करीत, व त्यांच्या नाटकांत त्या वेळच्या बहुतेक पृात्रांना शास्त्रोक्त रीतीनें गाण्याची पद्धत माहित असल्यामुळे


 * या वेळीं नाशिककर हरिदासबुवांच्या मागें मात्र एक सुरांची पेटी होती. याखेरीज दुसरी पेटी पुण्यास कोठें दृष्टीस पडत नव्हती. आतां पेट्या इतक्या झाल्या आहेत कों, तिच्या शिवाय तमाशेही अडूं लागले आहेत!