पद्धतीनें तास तास म्हणतात, तशी नाटकांतील पदयें म्हणतां
येणार नाहीत. याच कारणासाठी मराठी संगीत नाटकांच्या
पहिल्या कवींन ख्याल, टप्पे, वगैरे वर्ज करून ठूंबऱ्या, लवण्या,
पदये मात्र उचलिल, असें झणतात; पण आतां यांना पदयेही
झेंपतनाशीं झाली आहेत. पाशी चालीचीं ठेक्यावरच पदये
दिवसानुदिवस आमच्या संगीत मंडळ्या उचलीत आहेत. रागबद्ध
संगीताचा प्रकार नाटकांतून घालतां येणार नाही. हें म्हणणें
चुकीचे आहे.रागदारींतील एकेक पद्य तास तास म्हणून नाट
कांत कधीही चालावयाचें नाहीं व अशानें नाटकाचा प्रयोग
लवकर आटपणार नाहीं हें खरे; पण तेवढयानं रागबद्धसंगताचा प्रकार नाटकांत आणण्यास कांही हरकत येते असें नाहीं.
रागाचे स्वरूप कायम ठेवून प्रसंगास अनुसरून योग्य पात्रांकडून
सरस पदये म्हणविलीं तर नाटक लोकप्रिय झाल्यावांचुन कधीही
राहणार नाही; व किर्लोस्कर मंडळीचे मूळ उत्पादक यांनी
जी विशेष गोष्ट केली तीं हीच होय. हे उठणें संगीत,
बसणें संगीत, निजणें संगीत, शिकणें संगीत, फार काय,
मरणेसुद्धां संगत झाल्यामुळे व ‘वड्यांची ‘ ' विटाळ्याचा '
आणि ‘कोंदणाची’ पर्ये कंबकोंबून नाटकांत भरल्यामुळे नाटकांतील पात्रांस जसे त्यांचे अजीर्ण होतें तसाच प्रेक्षकांस
त्यांचा वीट येतो, व त्यामुळे 'वन्समोअर-नोमोअर'चे झगडे
चालून गाणारें पात्र खजील होते व त्याला काय करावें हें समजत
नाही. कै. किर्लोस्कर यांनी जी मंडळ जमविली होती, तीवर
असा प्रसंग कधीही आला नाही. उलट वन्समोअरचा एकच ध्वनि
दुमदुमत राहिल्यामुळे पात्रांना हुरूप येऊन त्यांच्या हातून अजब
करामत होत असें.
नाटकें-प्रयोग उत्तम वठण्यास नाटक सरस पाहिजे ही दुसरी
गोष्ट होय. सरस नाटकाची जी लक्षणे आहेत त्यांत प्रसादयुक्त
पदये, उदात्त व गंभीर कल्पना, पात्रांचे योग्य स्वभाव बनविंणे,
संविधानकचातुर्य व प्रसंगांस अनसरून भाषणे ही मुख्य होत.
हीं लक्षणें लागू असणारी किती नाटकें हल्लींच्या संगीत मंडळ्या
पान:मराठी रंगभुमी.djvu/२९०
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२५६
मराठी रंगभूमि.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/98/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%80.djvu/page290-896px-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%80.djvu.jpg)