म्हणजे ‘‘जिकडे हात तिकडे दृष्टि, जिकडे दृष्टि तिकडे मन,
जिकडे मन तिकडे भाव, जिकडे भाव तिकडे रस " असा प्रकार
असावा. तसेचः
कंठेनालंवयेद्रींत हस्तेनाथ प्रदर्शयत् ।
चक्षुर्भ्या दर्शयेद्भावं पादाभ्यां तालमाचरेत् ॥
गळ्यानें गावें, हातानें अर्थ दाखवावा, डोळ्यानें मनोभिप्राय
कळवावा आणि पायांनीं ताल सुचवावा."
इंदुप्रकश--ता.४
नटास उपदेश -अनत वामन बर्वे.
सध्या उर्दू व पार्शी चालीवर फार भर आहे. याकरितां या चालीविषयीं थोड़े लिहिणे आवश्यक दिसतें. या चाली सर्वच चांगल्या किंवा वाईट आहेत असे नाही. विषयानुरूप पद्यांच्या चालीची योजना केल्यास जुन्या चालींचा एकसुरीपणा किंचित् कालपावेतों दूर होऊन विविधत्व येतें. पण या चालींची योजना फार सावधगिरीने झाली पाहिजे. बहुतेक पाशी व उर्दू चाल उडत्या व एकतारी असतात; नव्या असेपर्यंत आवडतात, नंतर लवकरच त्यांचा वीट येऊ लागतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. ‘ ऊठ ऊठ,' ' बैस बैस ' अशा प्रकारचे शब्द घातलेला माधुर्यद्दीन चालीवरची कविता फार दिवस टिकुन लोकप्रिय होणें कसें बड़ी संभननीय असेल ? याकरितां असलेल्यांत निवड करून भारदस्तपणाचा अंश जात असलेल्या चाली प्रसंगानुसार ज्या ठिकाणी घातलेल्या आढळन येतात त्या ठिकाणी त्या चांगल्या शोभल्याचेंही दिसून येते. पण हीचे पुष्कळ कवि केवळ नव्या चाली म्हणून सरसकट मिळेल त्या चालीचा उपयोग करितात. यामुळेचं या नवीन चालची लोकप्रियता आतां दिवसेंदिवस थोडथोडी कमी होत चालली आहे, व जुन्या चालीकडे फिरून लोकांचा कल जात आहे. हा प्रत्याघात झाल्यामुळे नाटकांतील