पान:मनतरंग.pdf/१४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 भारतीय संस्कृतीच्या सर्वांगीण सुंदतेचे…निखळ सत्याचे ऊर्जस्वल पदर साने गुरुजींनी शब्दा-शब्दांतून वाचकांसमोर साक्षात केले. पण हे ग्रंथ 'दूरदर्शन' च्या प्रभावाने चक्रावलेल्या कुमारवयातील मुला-मुलींनी कधी वाचायचे ?
 द्रौपदीस तिची व्यथा… संताप… घुसमट समजून घेणारा श्रीकृष्णसखा पाठीशी होता. ज्या समाजात संवेदनशील पुरुषांची परंपरा असते तेथील स्त्रिया किमान सुरक्षित जीवन तरी जगू शकतात.
 रावणाचे मन सीतेवर भाळले होते. परंतु तिच्या संमतीशिवाय त्याने तिला स्पर्शाने दुखावले नाही.

 स्त्री ही शिर (मन…भावनांचे प्रतीक) नसलेले 'कबंध'...चालते बोलते बिनडोक शरीर, अशी समजूत समाजाची नव्हती. त्या सांस्कृतिक बंधातून अनेक थोर पुरुष निर्माण झाले, अगदी कालपर्यंत. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज, गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, साने गुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, स्वा. विवेकानंद आदी नररत्ने…पण पुढे काय ?
 ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचे आव्हान २१ व्या शतकात आमचा समाज स्वीकारणार की नाही ?

■ ■ ■

मनतरंग /६