पान:मनतरंग.pdf/१०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रत्येक देशात एक 'कुटुंब कायदा' असायला हवा. धर्म कोणताही असला तरी कुटुंबाची रचना एकाच तऱ्हेची असते. पती-पत्नी, त्यांची मुले, त्यांच्यावर अवलंबून असलेले पालक आणि भावंडे. त्यांचे एकमेकांशी असलेले नाते, कर्तव्ये, यावर आधारित हा कायदा असावा. तो देशातील सर्वधर्मीय नागरिकांना समान असायला हवा, असे मत सर्वजणी मनापासून व आवेशाने व्यक्त करीत होत्या.
 आज बीजिंगची महिला परिषद होऊन तीन वर्षे उलटून गेली आहेत. मोहिनी गिरी, वसुधा धागमवार, इंदिरा जयसिंग फ्लेविया, रझिया यांच्यासारख्या हजारोजणी आपापल्या परीने समान कुटुंब कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. कायदे करून तरी उपयोग काय ? पुस्तकातले कायदे मनात...कृतीत कधी लिहिले जाणार ?
 रूखसाना अजूनही बाहेर बसून माझ्या उत्तराची वाट पाहतेय, उत्तर देण्याची शक्ती कधी येणार आहे ?

■ ■ ■

सवाल रूखसानाचा.../९७