पान:भाषाशास्त्र.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(2)


      लीन  जरठ  व ऋषिवर्यांनी आपल्या  मातृभाषेचे
चांगले लालनपालन केले ; तिला हरएक प्रकारे वाढीस
लावीले ; व तिजला पूर्णत्वास आणून , ह्या भूतलावरील
अखिल भाषांवर तिचे श्रेष्ठत्व स्थापिलें . इतकेंच नव्हे तर,
हें अमूल्य भाषाशास्त्र पद्धतशीर रीतीने कसें शिकावें ,
त्याचा शोध कसा लावावा , आणि त्याचें अन्वेक्षण कोणत्या
तऱ्हेने करावें , याबद्दलचा धडा सुद्धां पाणिनीसारख्या
अद्वितीय बुद्धिमत्तेच्या सर्वमान्य ऋषीने , आज
सुमारें चार हजार वर्षांपलीकडील कालांत , प्रथमतःच
घालून दिला; व त्यायोगाने अनंत उपकाराचे कधीही
न फिटणारे ओझे˙ एकंदर मनुष्यमात्रावर त्याने˙कायमचे
करून ठेविलें. ही गोष्ट आम्हीं सदैव ध्यानांत ठेवण्यासारखी
आहे; आणि म्हणूनच ती आम्हांला विसरत कामा नये.
आता पाणिनीच्या पूर्वी आणि त्याच्या नंतरही,
तत् तत् कालानुरूप असे, अनेक पंडितांचे भाषाशास्त्राविषयक
बरेच परिश्रम झाले होतें, यांत बिलकुल शंका नाहीं.

१. पंडित सत्यव्रत सामश्रमींच्या मते, पाणिनीचा काल इ. स.
पूर्वी २४०० वर्षे असल्याचे होतें. (निरुक्त. उपोद्घात पु. ६ र्वे. भा . ७
वा. पा. जी-झी.) डा. भांडारकराच्या अभिप्रायाप्रमाणे, पाणिनीचा काल इ. स.
पूर्वी ७०० वर्षे असावा असे वाटतें. (भांडारकरकृत दक्षिणचा
प्राचीन इतिहास. पा. ८ )
  पाश्चात्य पंडित वेबर, मॉक्समूलर, इत्यादींच्या मते, हा काल
इ. स. पू . ३५० वर्षे असावा. (संस्कृत वाड्मयाचा त्यांनी केलेला
इतिहास पहा. )