पान:भाषाशास्त्र.djvu/364

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्युत्पत्ति व अव्युत्पत्तिवाद. ३५५ नागाजी भट्टकृत लघुशब्देन्दुशेखरांत, असे म्हटले आहे की, ननुयत्रावयवार्थानुगमोनास्ति व्युत्पतिपक्षास येणान्या हरकती. ।

  • तत्रकर्थव्युत्पादनं शक्यमतउक्तम् ।

यन्न विशेषपदार्थसमुत्थं प्रत्ययतः प्रकृतेश्चतदूह्यामिति । * * उक्तप्रत्ययसादृश्यं ( प्रकृ तिसादृश्यं वा ) दृष्ट्वा तदितरोभागः प्रत्ययत्वेन कल्प्यः । ( प्रथमः पादः ।) किंबहुना, महाभाष्यांत केलेल्या पूर्वपक्ष प्रतिपादनाचा हा अनुवादच होय, असेही म्हणण्यास हरकत नाही. कारण, श्रीभगवत् पतंजलीने एके ठिकाणी असे लिहिले आहे की, प्रकृतिं दृष्ट्वा प्रत्यय उहितव्यः प्रत्ययंच दृष्ट्वा प्रकृतिरूहितव्या ।। संज्ञासु धातुरूपाणिप्रत्ययाश्च ततः परे ।। कार्याद्विद्यानुबंधमेतच्छास्त्र मुणादिषु ॥ ( महाभाष्यम् ३. ३. २ ). तथापि, मुळांत कांहीं एक नसतां भलत्याचीच कल्पना पा. करणे, अगर कांहीं तरी अध्याहृत अव्युत्पत्तिपक्ष पा- १ णिनीस मान्य अस- घेणे, हे मत युक्तिवादास अनुसरून ल्याविषयी प्रमाण. असल्याचे दिसत नाही. आणि म्हणनच, ते पाणिनीसारख्या प्रचंड व्याकरणमीमांसकारांस बिलकुल मत नाही, हे उघड आहे. आतां, व्युत्पत्तिपक्ष पाणिनी ऋषीस संमत नसून, अव्युत्पत्तिपक्षच त्यांस मान्य होता, अशाविषयी अनेक प्रमाणे आहेत. इतकेच नव्हें तर, नागोजी भट्टांनी तर त्याचा स्पष्टच उल्लेख केला आहे. कारण, एके ठिकाणी ते असे लिहितात की,