Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३६

[ भाग

भारतीय साम्राज्य.

मनाची समता राखली पाहिजे. तसेंच न्यायाधीशाच्या मना ची समता. वादी प्रतिवादी, किंवा फिर्यादी आणि आरोपी, अथवा बालक, वृद्ध, व दुः खातुर, यांचें अमर्याद असे भाषणही प्रसंगानुसार मोठ्या निग्रहानं सहन केलें पाहिजे. व न्याय देणें तो जातिनि- यमे, कुलसंप्रदाय, वणिगादि धर्म, आणि रूढिमार्ग, इत्यादि सर्व गोष्टी मनांत आणून दिला पाहिजे. परंतु, ज्या ए- काद्या गोष्टीचा धर्मदृष्ट्या निकाल झाला आहे, किंवा ज्या विषयासंबंधीं अमुक एक म्हणून शास्त्रव्यवस्था ठरली आहे, त्यांत कोणत्याही प्रकारें नवीन कुरापत काढून, राजानें वळाढवळ करता कामा नये. एकंदरीत धर्मन्याय होण्या- ण्यासाठी, त्याने हरएक तऱ्हेने झटावें हें भूषण होय. आणि


१ क्षेतव्यं प्रभुणा नित्यं क्षिपतां कार्यिणां नृणाम् ।

बालवृद्धातुराणां च कुर्वता हितमात्मनः ।। ३१२ ।।
२ जातिजानपदान्धर्मान् श्रेणीधर्माच धर्मवित् ।

समीक्ष्य कुलधर्माश्च स्वधर्मेप्रतिपादयेत् ।। ४१ ।।

( म. स्मृ. अ. ८ . )

३ म. स्मृ. अ. ९ श्लो. २३३.

४ नोत्पादयेत्स्वयं कार्ये राजा नाप्यस्य पूरुषः ।

नच प्रापितमन्येन प्रसेदर्थे कथंचन ।। ४३ ।।

( म. स्मृ. अ. )


सद्भिराचरितं यत्स्याद्धार्मिकैश्च द्विजातिभिः ।
तद्देशकुलजातीनामविरुद्धं प्रकल्पयेत् ॥ ४६ ॥ कित्ता ॥