[ भाग
बंदोबस्त करण्याच्या कामी राजानें झटावें. गांवचें काम
सुरक्षित रीतीने चालण्यासाठीं, प्रत्येक गांवांत एक
ग्रामाधिकारी नेमावा.तदनंतर जशी अवश्यकता असेल
त्याप्रमाणें दहा, वीस, शंभर, किंवा हजार, अशा गांवां-
वर एक मुख्य कामगार नेमून, प्रत्येकावर त्याच्या
वरिष्ठाचा ताबा राही अशी व्यवस्था ठेवावी.
तदनंतर, सदरहूप्रमार्णे नेमलेल्या नोकरांचा मुशाहिरा
तत्संबंधी कामगा-
रांचा मुशाहिरा
देण्याविषयीं, व त्यांनी आपल्या
वतनाखेरीज इतर कोणत्याही कुमा-
र्गाचें अवलंबन करूं नये ह्मणून आणि
त्यांनीं लाच घेऊं नये एतदर्थ, फारच सुरेख व सविस्तर
विवेचन मनुस्मृतीत दृष्टीस पडतें. लांच घेणारास बरीच
कडक शिक्षा सांगितली असून, त्याची सर्व जिनगी व
मालमत्ता जप्त करून त्यास हद्दपारही करावें, असें
स्मृतिकरांचें वचन आहे.
झासारवण करणें, पाणी वगैरे आणणे, इत्यादि
२ म. स्मृ. अ. ७ श्लो. ११८ ११९/१२६.
७ ये कार्यकेभ्योऽर्थमेव गृह्णीयुः पापचेतसः ।
तेषां सर्वस्वमादाय राजा कुर्यात्प्रवासनम् ॥
( म. स्मृ. अ. ७ श्लो. १२४. )
४ पणोदेयोऽवकृष्टस्य षडुत्कृष्टस्य वेतनम् ।
( म. स्मृ. अ. ७)