१७
तजवीज केली पाहिजे. हे दुर्ग सहा प्रकारचे सांगितले
असून, त्या सर्वात गिरिदुर्ग हा फारच महत्वाचा असल्या-
विषय मनुस्मृतीत वर्णन आहे. कारण, प्राकारस्थ असा
योद्धा शंभर असामींचा समाचार घेतो, व अशा प्रकारचे
शंभर योद्धे दहा हजार इसमांस भारी होतात, यांत
संशय नाहीं. मात्र अशा प्रकारच्या
किल्यांत सर्व प्रकारची आयुधें व
खड्गे असली पाहिजेत. इतकेंच नाहीं
बाह्य परचक्राचा
बंदोबस्त.
तर, त्यांत धन, धान्य, व उदक, यांची समृद्धि असून,
शिवाय करितुरगादिवाहनें, सर्व प्रकारची सामग्री, नाना
प्रकारची यंत्रे, आणि तत्संबंधी कारागीर, यांची रेलचेल
असली पाहिजे. व साधारणपणें ज्या ज्या वस्तूंची ह्मणून
अशा ठिकाणी जरूर लागेल त्या त्या वस्तु ताबडतोब उप-
लब्ध होतील, अशी चांगली तरतूद अवश्य राखली पाहिजे.
नाही तर, शत्रूचा वेढा पडल्यावर सामग्री खुटल्यास सर्वांची
दाणादाण होऊन तोंडचे पाणी पळेल; व सर्वत्र हाहा -
कार होऊन सामनेवाल्याला शरण जाण्याची पाळी येईल.
बृदुर्गे गिरिदुर्गे वा समाश्रित्य वसेत्पुरम् ॥ ७० ॥
सर्वेण तु प्रयत्नेन गिरिदुर्ग समाश्रयेत् ।
(मनुस्मृति अ. ७.)