एक सूचना. ७३ हे उघड आहे. तरी पण एक गोष्ट मात्र ते नेहमी मोठ्या कळकळीने सांगत, आणि ती उघडपणें तशीच लोकांस सांगणें अवश्य आहे असे आम्हांसही वाटतें. " देशाचा उद्धार कधीही होवो, आज देशाची स्थिति कितीही सुव्यव- स्थित व शांत असो, आणि लोकांत उन्नति व ऐक्यभाव कितीही झालेला दिसो, त्याच्यावर म्हणजे विशेषतः हिंदु लोकांवर असा एक काळ लौकरच येणार आहे कीं, त्याच्याकरितां आतांपासून जर तरतूद केली नाही, तर त्यांना ' दे माय धरणी ठाय' होऊन जाईल. यांतून केवळ परमेश्वराच्या कृपेनेंच पार पडणें शक्य आहे. त्या काळांत 'जीव मुठीत धरून ' कसेबसें तरी जगतां येईल, ( अर्थात् राष्ट्र या रीतीनें ) अशी सोय करणे भाग आहे; व स्वतःच्या श्रद्धावुद्धथनुरूप कांहीं तरी त्याकरतां इमाने इतबारें प्रत्येकानें केले पाहिजे, मग तीं नमस्कारानें शरीर कमावण्यासारखी एकादी दृश्य, अथवा ईश्वरास कळकळीने प्रार्थना करण्यासारखी एकादी अदृश्य गोष्ट असो, " असें तें सांगत असत. या विषयीं कांहीं जास्त लिहितां येत नाही, परंतु जगांतील एकंदर राजकारण 'तंजीव' व 'तघलीव' यासारख्या चळवळी, आणि भयसूचक घंटेसारखी पुस्तकें, इत्यादि सर्व प्रकार लक्षांत घेतां व या दिशेने कांहीं तरी केले पाहिजे, असे विचारी लोकांस जे वाटू लागले आहे, तें पाहिलें म्हणजे या उपदेशाचे महत्त्व लक्षांत येतें.