व्यसन होय. ' असे उद्गार त्याने काढले आहेत ते अगदी यथार्थ आहेत. या
पूर्वी हर्षराजाचे दरबारी बाणाचें येणे जाणे नव्हतें, व त्याच्या पूर्वजांचेंहि
नव्हते. तेथें त्याचा कोणाशीं परिचयहि नव्हता. ह्या वर्णनांत त्या ठिकाणी
विद्येचें फारसें कौतुकहि नाहीं ! असेंहि बाणानें झटलें आहे. यामुळे बाणास
प्रथमतः हर्षराजाकडे जाण्यास मोठी काळजी वाटली होती. तथापि 'फलम-
तिबंधी धीमद्भिरपहरणीयः कालातिपातः ' ' व्यर्थ काल घालविणें ठीक
नाहीं' या कृष्णराजाच्या लेखावर भिस्त देऊन व श्रीशंकरावर भरवसा
ठेवून त्यानें जाण्याचा निश्चय केला.
हर्षराजाकडे निघण्याच्या दिवशीं वाणानें प्रातःस्नान व संध्यादि कमें
केल्यावर प्रथम शंकराचें दुग्धाभिषेकपूर्वक पूजन केले. नंतर होमहवन करून
ब्राह्मणांनां दानधर्म केला व गाईला प्रदक्षणा केली. त्याची आत मालती
इनें त्याचे प्रस्थानमंगल केले. त्यानें तिला व गुरुजनांना नमस्कार केले.
त्यांनींहि त्याला शुभाशीर्वाद दिले. मग तो प्रीतिकूट गांवाहून निघून व
चंडिकवन उल्लंघून मल्लकूट हा गांवीं गेला. तेथे त्याचा आप्त जगत्पति यानें
बाणाचे चांगले आदरातिथ्य केलें. दुसरे दिवशीं भागीरथी उतरून तो यष्टि-
ग्रहक नांवाच्या गांवीं रात्रीं राहिला व दुसरे दिवशीं जवळच हर्षराजाची
छावणी होती तेथें तो गेला.
त्या ठिकाणी विश्रांति घेतल्यावर प्रहरदिवस राहिला तेव्हां तो मेखलका-
बरोबर हर्पराजास भेटण्याकरितां निघाला. वाटेनें मांडलिक राजांची शिबिरें
व बाहेरून आंत व आंतून बाहेर येणारे जाणारे हजारों हत्ती, घोडे व उंट
इत्यादिकांची मौज, पहात तो चालला असतां राजाच्या छावणींत असंख्य
१ ' किं करोमि । अन्यथा संभावितोऽस्मि राज्ञा । निर्निमित्तबन्धुना च संदि-
ष्टमेवं कृष्णेन । न च तत्र मे पूर्वजप्रवर्तिता प्रीतिः । न राजवल्लभपरिचयः । न वि-
द्यातिशयकुतूहलम् । अवश्यं गंतव्यं । सर्वथा भगवान्पुरारातिर्भुवनगुरुर्गतस्य मे सर्वे
सांप्रतमाचरिष्यति ' इत्यवधार्य गमनाय मतिमकरोत् ।
२ 'अभवच्चास्य जातविस्मयस्य मनसि कथमिवेदमियत्प्रमाणं प्राणिजातं जनयता
प्रजासृजां नासीन्महाभूतानां वा परिक्षयः, परमाणूनां वा परिच्छेदः कालस्य वान्तः
आयुषो वा व्युपरमः आकृतीनां वा परिसमाप्तिः' इति ।