ही बाणकवीची करामत पाहून भगवान् शंकराचार्य यांच्या उक्तीचें
येथें स्मरण होतें:-
दृष्टान्तो नैव दृष्टस्त्रिभुवनजठरे सद्गुरोर्ज्ञानदातुः
स्पर्शश्चत्तत्र कल्प्यः स नयति यदहो स्वर्णतामश्मसारम् ।
न स्पर्शत्वं, तथापि तिचरणयुगे सद्गुरुः स्वीयशिष्ये
स्वयं साम्यं विधत्ते, भवति निरुपमस्तेन वालौकिकोऽपि ॥ १ ॥
शतश्लोकी.
ज्ञान देणाऱ्या गुरूला दृष्टांत देण्यास जगांत कोणतीहि तत्समान वस्तु
नाहीं परिसाचा दृष्टांत द्यावा, तर तो लोखंडाचें सोनें करतो इतकेंच, परंतु
स्वस्वरूप [ परीस ] बनवीत ! नाहीं ! ज्ञानरूपी गुरु तर शिष्याला आप-
ल्यासारखा [ ज्ञानी ] बनवितो ! याप्रमाणें विचार करून बाणकवीनें
हर्षास आपल्यासारखे विद्वान् व कवि केले! 'आपणांसारखे करिती तात्काळ'
अशी प्राकृत कवीची उक्तिहि याच अर्थी आहे. आतां हें वेदांतांतील वचन
आहे, तथापि तें येथेंहि बरोबर लागू पडलें आहे !
ह्या पृथ्वीच्या पाठीवर पाहूं गेलें असतां हर्षराजासारखा सद्गुणमंडित
राजा क्वचितच आढळेल. यूरोपखंडांतील सीझर, नेपोलियन इत्यादि तद्दे-
शीय शूर राजांनी युद्धसंबंधी कांही टिप्पणे करून ठेवली आहेत. तर तिकडील
लोक त्यांची किती तरी महती वर्णन करतात ! हर्षराजावर तर हिंमत खच
विणारे मोठमोठे दुःखकारक दुर्धर प्रसंग गुजरले असतां आपल्या कविवर्या-
प्रमाणे आपलें धैर्य खचूं न देतां त्यानें महान् पराक्रम करून आपल्या शत्रूचा
पराभव केला, राज्याचा विस्तार केला, बाणकवीसारख्या विद्वानांच्या
सहवासाने चांगलीच विद्या संपादून ग्रंथ केले व राज्योपभोगांत किंवा विषय-
सुखांतच गर्क न राहतां कर्णासारखे दोन्ही प्रकारचें शौर्य दाखवून दिवा-
कर मित्रासारख्या सत्पुरुषांच्या समागमानें परलोक जिंकण्याचेंहि साधन केलें !
याशिवाय ह्या निबंधांत ध्यानांत ठेवण्यासारख्या आणखीहि गोष्टी आहेत.
हर्षाचा बांधव कृष्णराज याचें निरपेक्ष परोपकारकर्तृत्वाचें वर्णन फारच
प्रशंसनीय आहे. यामुळे-
या कवीच्या उक्तीचे स्मरण होऊन कृष्णराय हा उत्तम सज्जनांच्या कोटीं.