ह्या त्याच्या उद्गारावरून रघुनाथपंडित हा अठरा विश्वे दारिद्रयानें पीड-
लेला होता, असे कोणाच्याहि लक्षांत येण्यासारखे आहे ! अशीच प्रायः
मुक्तेश्वर वगैरे इतर कवींचीहि स्थिति होय !
दुसरें, परद्वीपस्थ इंग्लिश ग्रंथकार डॉ. जॉनसन याचे उदाहरण पहा !
हा ग्रंथकार थोरल्या ( अक्का ) बाईच्या वाटयास गेला होता ! यामुळें
त्याची आई वारली तेव्हां तिचें और्ध्वदेहिक करण्यास त्याजवळ एक छदाम
देखल नव्हता. तेव्हां त्यानें 'रासेलस' नांवाचा ग्रंथ करून व त्याचा हक
विकून त्या द्रव्यानें आपल्या आईचा दिवस केला ! ही गोष्ट तर आधुनिक
विद्वानांत प्रसिद्धच आहे. सारांश, उपजीवनाच्या मार्गे धावणें, है तर प्रायः
सर्वोच्या नशीबीं लागलेच आहे. तथापि त्यांतले त्यांत चैनीत फारसा वेळ
न घालवितां आळस सोडून 'बिंदुसरो' न्यायानें किंवा “ कणशः क्षण.
शश्चैत्र विद्यामर्थेन साधयेत् " या वचनास अनुसरून उद्यमपरता
स्वीकारली असतां कालगतीनें मोठमोठी कार्ये घडून येतात! हे तत्त्व नेहमी
लक्षांत ठेवून उच्चप्रतीच्या उपयुक्त ग्रंथादिकांविषयी प्रयत्न चालू ठेवले
असतां ते सिद्धीस जाणार नाहीत, असें कदापि होणार नाहीं ! असो.
साहित्यशास्त्रांत गद्य काव्याचे आख्यायिका व कथा असे दोन भेद
सांगितले आहेत.
अलंकारसंग्रह.
बाणभट्टाचे दोन्ही ग्रंथ या दोहींची उदाहरणं होत. त्यानें स्वतः हर्ष-
चरितास ' आख्यायिका ' म्हटले आहे. व कादंबरीस ' कथा' असेंहि
म्हटले आहे. ते असे:--
हर्षचरित.
कादंबरी
.
अग्निपुराणांत अनेक विषयांचे निरूपण केले आहे.त्यांत आख्यायिका
आणि कथा यांचीहि लक्षणे सांगितली आहेत ती अशीं: --