या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
माधवाने खिशातील ती कुपी काढली. तिचे बूच त्याने काढले. " टाकू
का पिऊन ? काय करायचे जगून ? काय मिळविले ? सारे जीवन व्यर्थ
आहे. मानवी जीवनात अर्थ नाही. पडू दे ही मातीत माती. " असे तो
म्हणत होता. पुनःपुन्हा ती कुपी तो तोंडाजवळ ई. परंतु पुन्हा
खाली येई. “ छे. जगाला कंटाळून का मरू ? निराशेने मरू ? मी
भ्याड आहे ? दुनिया मला भेकड मानील. माधव भेकड नाही. माधव
निराशेच्या आहारी जाणार नाही. माधव जगात कोणालाही शरण
जाणार नाही. नकोत हे मरणाचे विचार आत्महत्येचे दुबळे विचार. "
त्याने तो कुपो दूर भिरकावून दिली. त्याने मरण भिरकावले; पुन्हा
जीवनाला मिठी मारायला तो उभा राहिला.
- * *
असमाधान * ६९'