पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


हे सारे असूनही! (कथासंग्रह)
मोहन आळतेकर

_____________________________________


समाज संवेदी लेखन

 माणूस का लिहितो... लिहिता होतो... त्याचं सरळ उत्तर द्यायचं झालं तर ‘मोकळं होण्यासाठी' असं द्यावं लागेल. लिहिणारा जे लिहितो त्याची अनेक आवर्तनं मनात आधी घडत-बिघडत राहात असतात. माणसाचं लिहिणं हे बेचैनीची परिणती असते. गद्य आणि पद्य लेखनात हाच फरक असतो. गद्याच्या लेखनपूर्व उलाढाली उमजत असतात. पद्य एकदम प्रगटतं. पण पद्यातही उलघाल असते. पण ती अबोध रूपात. बेचैनी असते ना माणसाची तीपण दोन तव्हेची. एक 'स्व' विषयक आणि दुसरी ‘पर विषयक. स्व बेचैनी ही स्वार्थातून येते. अन्यांविषयी वाटणं ही सामाजिक संवेदनशीलतेची खूण. मोहन आळतेकरांना उपजत एक बेचैनी मन लाभलंय. ती त्यांच्या घडणीची देणगी होय. मनुष्य प्रतिकूलतेवर मात करून जेव्हा सावरतो, सरसावतो तेव्हा त्याला सुखही निश्चिंत बसू देत नाही. विकतचं श्राद्ध' ही त्याची वृत्ती बनून जाते. मग तो आपला संवेदनशीलता रिचवण्यासाठी, पचवण्यासाठी छोटी मोठी धडपड करत राहतो. कधी लिहितो, कधी बोलतो, कधी काहीबाही, सटर-फटर करत राहतो. ‘चिंतातुर जंतू' ‘अस्वस्थ आत्मा', ‘भरकटलेलं भूत' लोक काही म्हणोत, त्याच्या लेखी ते सामाजिक आन्हिक असतं. असं करण्यातून त्याला जगण्याचं


प्रशस्ती/२६५