पान:प्रशस्ती (Prashasti).pdf/265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


◼◼

लाह्या करण्याची कवी भावना व भाषा समाजातील त्रुटींवर नेमका बोट ठेवून क्रोधास ज्या आक्रमक पद्धतीनं व्यक्त करतात तेव्हा महायुद्ध दलित काव्याची प्रातिनिधिक प्रतिक्रियात्मक शैलीत सादर होताना आढळते. ‘आठवी पास की नापास' कविता वर्तमान शिक्षण पद्धतीचे विडंबन नेमकेपणाने व्यक्त करते. समग्रतः ‘महायुद्ध' काव्यसंग्रहात कवी वसंत भागवत आपलं जीवन प्रतिबिंबित करणाच्या कविता लिहीत असते तरी त्या स्वानुभवाचे उद्गार म्हणून त्यांचे आगळे असे गुणवैशिष्ट्य आहे. कवीच्या या आरंभिक ‘महायुद्ध'मध्ये त्यांना वाचक मिळून तो अधिकाधिक काव्य रसिकांपर्यंत जाईल तर मराठी कविता अनुभव व आशय समृद्ध झाल्याची प्रचिती देईल. शुभेच्छांसह नवोदितांना प्रोत्साहन देण्याचे निर्मिती संवादचे धोरण व अनिल मानेंचे प्रोत्साहन मराठी साहित्य विकासाचेच कार्य होय.

◼◼



'दि. १४ एप्रिल, २०१४

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती







प्रशस्ती/२६४