पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/180

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 तरीही दुपारी सर्व स्त्रिया एकत्र जमत. आधी आधी अमिना संकोचामुळे व कादरच्या धाकामुळे त्यांच्यात मिसळत नसे. मग त्यांनीच तिला ओढून आपल्यात नेलं. लंका, सोजीर व गजरा तिच्या मग जिवाभावाच्या मैत्रिणी झाल्या.

 त्यांच्या सहवासात मात्र तिला जाणीव झाली की, आपल्याला जादा पोरं आहेत. त्यांना आपण नीट पोसू शकत नाही. शिक्षण दूरच राहिलं... यापुढे मुलं बंद केली पाहिजेत.

 भीत भीत एकदा तिनं कादरला हे सांगितलं, तेव्हा त्यानं तिला काठीनं फोडून काढलं. “खबरदार, जो ऐसी बात फिर जबान तक लाई तो ! ये इस्लाम के खिलाफ है. वो मौलवी साब कहते हैं....'

 ‘उनका हाल देखो - पहनने को कपड़े नही है... खाने की बोंबाबोंब - कैसा चलेगा ?'

 ‘अल्लातालाने जनम दिया है, तो वो दानापानी भी देगा !' कादरनं ठामपणे सांगितलं. ‘और सिर्फ दोही तो लडके हैं. बाकी पांच लडकियाँ, मुझे और दो बच्चे चाहीये. समझी? मैंने ही तुझसे शादी करके भूल की तेरे मैके में सबके यहाँ लडकियाँ ही जादा हैं. लड़के पैदा करने के गुणही तुझ में कम हैं.'

 त्याच्या या अजब तर्कशास्त्राला तिच्याजवळ उत्तर नव्हतं. निमूटपणे त्याला देह देणं, एवढंच तिला आता करायचं होतं.

 मुलांचं वेड असलं तरी प्रपंचाबद्दल कादर पूर्ण बेफिकीर होता. कामासाठी धडपड करणं त्याच्या वृत्तीतच नव्हतं. तसा हुनर होता त्याच्या हातात. गवंडी कामात तो तरबेज होता; पण आळस व मौजमस्तीचा स्वभाव असल्यामुळे महिन्याकाठी आठ-दहा दिवसही तो काम करीत नसे. बाकीचा वेळ विड्या फुकणे व लहर आली की अमिनाचा भोग घेणे, हाच त्याचा विरंगुळा होता.

 तालुक्याला गेला की तीन-चार दिवस तिची सुटका व्हायची; पण तिथं त्यानं एक बाई ठेवली होती. कमावलेला सारा पैसा तो दारूत व तिच्यावर उधळायचा. हेही तिला एक स्त्री म्हणून संतापजनक वाटायचं आणि आई म्हणून वाईट वाटायचं. कारण

पाणी! पाणी!! / १७८