पान:पाणी! पाणी!! (Pani ! Pani !!).pdf/140

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 फक्त आमदारांनी केरगाव मुक्कामी त्यांना इराच्या वाडीचे लोक भेटायला आले असता 'तुम्हाला आमदार फंडातून नवीन स्वतंत्र नळयोजना मंजूर करून देत आहे' अशी घोषणा केली.

 केवळ घोषणा... तिला कधी मूर्त रूप आलंच नाही.

 इराच्या वाडीकडे जगदीश व जाधवांनंतर कोणी फिरकूनही पाहिलं नाही, हे विदारक वास्तव होतं.

 '...तर मग सांगा सायेब, हेच म्हनायचं का तुमचं ‘झकास परशासन?' तुमी रोड करून दिला रोजगार हमीतून... दोन सालातच विस्कटून गेला. पुना पहिल्यापरमाणं खड़ी बाहेर आली. पक्की डांबरी सडक काय नाही झाली अजूनपत्तुर आन पाणीपुरवठ्याची ही अशी चित्तरकथा... मग गाव दुर्दैवी का म्हणू नये? नारूवाडी का म्हणू नये? तुमीच सांगा सायेब... माजी सम्दी जिंदगी सरली या प्रश्नाचा पाठपुरावा करत.... बाहेर माझा तरणाबांड नातू हाय बसलेला... जवान गडी, पण उबं राहू शकत नाही फार काळ... कारणं ? कारण तेलाबी नारू झाला हाय साहेब, तेलाबी नारू झाला हाय....'


☐☐☐

पाणी! पाणी!!! १३८