पान:पाणिपतची बखर.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

० रघुनाथ यादव-विरचित होऊन सिंहनादं गर्जा लागले. दोहीं दळांत शस्त्रे एकवटलीं. दोहीं दळांमध्यभागीं रक्तोदकाच्या नद्या वाहूं लागल्या. तेव्हां पिशाचसमुदाय आनंदे करून नाचू लागले कीं, चारशे वर्षे झाली. क्षुधातूर होतो. ते समयीं अठरा अक्षौणी दळांचे रक्तमांस भक्षिले. त्या अलीकडे फार दिवस भोजन नाहीं. याजकरितां श्रीईश्वराने आम्हांकरितां हें युद्ध निर्माण केले.' असे म्हणून भक्षावयास लागले. अशी युद्धाचीं सीमाच जाहली. फौजेचा मार वि |- .." (३) चारशे कशी ? (२) का. ना. साने टीप देतात-' इतकाच मजकूर एकूणपन्नासाव्या पृष्ठाच्या अर्धाच्या शेवटपर्यंत आला आहे. पुढे बंद किती होते ते खात्रीलायक कळत नाही, तरी १० एक असावे.,