पान:पाकिस्तानचे संकट.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ५व । मुसलमानांच्या मागण्यांचा क्रमविकास ___टप्पा तिसरा : १९२० ते १९४१ कै० लोकमान्य टिळकांविषयींची एक आख्यायिका मोठी सूचक आहे. होमरूल चळवळीला ऐन भर आला होता व टिळकांनी ठिकठिकाणच्या ठळक पुढाऱ्यांना पुण्यास बोलावून घेतले होते. संध्याकाळच्या सुमारास ही मंडळी काही महत्त्वाचे काम करीत होती; इतक्यांत, बैठकीच्या बाजूच्या सज्ज्यांत एक संन्याशी येऊन उभा ठाकला. बऱ्याच मंडळींचे लक्ष कामांतून निघालें व ती मंडळी बैठक सोडून, आदरमिश्रित जिज्ञासेनें, त्या संन्याशापाशीच बोलत उभी राहली! काही वेळाने संन्याशी निघून गेला. मंडळी परत बैठकीत आल्यावर टिळक जरा रागानेंच म्हणाले : माझ्या डोक्यावर शेंडीच्या दोन बटा शिल्लक आहेत; एवढ्यामुळे मी संन्याशी ठरत नाही की काय ? टिळकांच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या प्रश्नांतच आहे. वृत्तीने संन्याशी नसून, मनुष्य नुसता वेषाने संन्याशी असला तरीहि, हिंदुसमाजांतली मोठमोठी माणसें त्याच्याकडे आकर्षिली जातात. क्षीरसमुद्राने श्रीविष्णूचा पीतांबर पाहून त्याला आपली मुलगी दिली; पण, शंकर दिगंबर असल्याचे दिसतांच त्याने हलाहल विष त्याच्या हवाली केलें. हिंदुस्थानांतल्या लोकसमुद्राची वृत्ति याच्या अगदी उलट आहे ! दिगंबरत्वावर भाळून तो हवी ती वस्तु दिगंबराला अर्पण करण्याला प्रवृत्त होईल; पीतांबराला तो हलाहल देईल, असेंच केवळ नव्हे; पण, पीतांबरदर्शनाने त्याची सर्वस्वसमर्पणबुद्धि जागृत होणार नाही, हे मात्र खरें! १९२० सालीं गांधीजींचा उदय हिंदुस्थानच्या राजकीय क्षितिजावर झाला; तेव्हां हिंदुसमाजाच्या मानसिक घडणीतला हा विशेष त्यांना पुष्कळच उपयोगी पडला. पारतंत्र्यांत पिचत राहण्याला कंटाळलेल्या हिंदुसमाजाला एका वर्षांत स्वराज्यप्राप्तीची घोषणा करणारा हा संन्याशी ईश्वरी अव