पान:पाकिस्तानचे संकट.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुसलमानांच्या हृदयपालटाची जरुरी आपल्या औदार्याचा जगांत दुरुपयोग होतो, आपल्या जा सात्त्विकपणाचा इतरांच्या तामसीपणामुळे चेंदामेंदा होतो आणि आपला चांगुलपणा शेवटी आपल्याच हिताला बाधक ठरतो या गोष्टी जगाच्या व्यवहाराकडे डोळसपणाने पाहणाऱ्या हिंदु समाजाला आतां पक्केपणी कळलेल्या आहेत. मुसलमानांशी तडजोडीचे बोलणे करणे म्हणजे आपल्या हाताने आपल्या हितावर पाणी सोडण्याला प्रवृत्त होण्यासारखे आहे हे शहाणपण, भारी किमत देऊन, हिंदुसमाज आतां शिकला आहे. मुसलमानांशी होणारा. कोणताहि राजकीय व्यवहार देवाण-घेवाणीच्या स्वरूपाचा असू शकत नाही, अशा व्यवहारांत आपल्याला सारीच देवाण करावी लागते, घेवाणीचा संबंधच उरत नाही हा रोकडा अनुभव हिंदुसमाजाने आतां आपल्या संग्रहीं बाळगला आहे. आणि म्हणून, यापुढील काळांत हिंदुसमाज मुसलमानांशी कसलेंहि: तडजोडीचे, सलोख्याचें, खेळीमेळीचें अगर देवाणघेवाणीचे बोलणेच करण्याला तयार नाहीं! इंग्रजांपासून मिळेल तो फायदा मिळवावा, हिंदूंच्या अधीरपणाचा फायदा घेऊन शक्य तें जातिहित साधावें अशा वृत्तीने वागून मुसलमानांनी आपली किती नागवण केली आहे हे हिंदुसमाज सहजासहजी विसरेल, हे शक्य दिसत नाही. तडजोडीची उत्सुकता आजवर हिंदुसमाज दाखवीत आला आहे. यापुढे ती उत्सुकता मुसलमानांच्या बाजूने दाखविली गेली पाहिजे. भांडण होण्याला जसे दोन पक्ष लागतात तसे ऐक्य साधनालाहि दोन पक्ष अवश्य असतात. आजवरची बहतेक सारी ऐक्याची बोलणी एकपक्षीय होती; आणि, म्हणूनच ती अस्वाभाविकहि होती. आजवरचा हा अस्वाभाविकपणा व एकपक्षीयपणा फटक्यासरशी निघून जाण्याचा एकच एक मार्ग शिल्लक राहिलेला आहे. मुसलमानांचा हृदयपालट होणं आणि त्या हृदयपालटाची मूर्तिमंत लक्षणे म्हणन वर निर्दिष्ट केलेल्या गोष्टी त्या समाजाने करणे, हाच तो एकमेव मार्ग होय. 'डॉ० आंबेडकर यांनी पाकिस्तानवरील आपल्या ग्रंथाच्या उपसंहारारात्मक भागांत वादी-प्रतिवादींमधील दाव्यांत मुद्दे काढण्यात येतात तसे; १३पाकि०