पान:पाकिस्तानचे संकट.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आंबेडकरांना कांहीं सवाल (अफगाणिस्तान काश्मीर } इसन हिंदुस्थान नंपास संयुक्त प्रांत आसाम कराची सध नंगाला अरबी समुद्र हैद्राबाद बंगालचा उपसागर रस्वामित भाग:-बेडकरांचे 'पाकिस्तान उरलेला भाग:- हिंदुस्थान या सध्याची संस्थान भाग निहिंदु व्हावे हा त्यांचा हेतु असल्यामुळे, त्यांनी हिंदु-मुसलमान लोकसंख्येची सोइस्कर रीतीने अदलाबदल करण्यात यावी, असेंहि सुचविले आहे. : अशी अदलाबदल हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीवरील कोपऱ्यांत व पूर्व कोपऱ्यांत झाली तरीहि, दिल्ली-संयुक्तप्रांतापासून खाली जो सलग हिंदुस्थान राहतो त्यांत हिंदु-मुसलमानांची संमिश्र वस्ती शिल्लक उरते आणि त्यामुळे या भागांत निर्माण होणाऱ्या राज्यव्यवस्थेला हिंदुमुसलमानांच्या कटकटीची बाधा होण्याचा संभव शिल्लक उरतो हे स्वतः डॉ. आंबेडकरांनीच कबूल केले आहे. उत्तरेकडील व पूर्वेकडील विभागांत मुसलमानांची सलग राज्ये निर्माण झाल्याने त्या भागांत अंतर्गत शांतता कितीशा प्रमाणांत नांदेल. त्या भागांपासून अलग करण्यांत आलेल्या हिंदुस्थानांतील हिंदु-मुसलमानांच्या ११पाकि०