पान:पाकिस्तानचे संकट.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

द्विराष्ट्रवादाचे खंडन १४७ 'पांतला आर्स अॅक्ट अस्तित्वात आलेला नव्हता. म्हणजेच असे की, आततायी माणसाला आवरण्याची शक्यता त्या वेळी व्यक्तिमात्राच्या ठिकाणी आजच्याहुन अधिक होती. ही शक्यता कमी झाल्यामुळे, काठीलाठी या साधनांचा तरी स्वसंरक्षणार्थ नीट उपयोग व्हावयाला पाहिजे. पण दंगे सुरू होऊन अंशांतता पसरली की, भांबावून गेलेले अधिकारी स्वसंरक्षणाची हीच साधनें मामुली व्यवहार करणाऱ्या नागरिकांच्या हाती नांदू देत नाहीत! निसर्गाने पुरविलेली हात, दांत वगैरे साधनेंहि आक्रमक स्वरूपाची आहेत असे समजून, अधिकारी त्यांच्या उपयोगावर अद्यापि नियंत्रण घालू लागले नाहीत, हेंच भाग्य समजण्याची वेळ आली आहे! हिंदू समाजाच्या या असहायपणाचा फायदा घेऊन, वाटमारीच्या पद्धतीने आपले म्हणणे त्यांच्या गळी उतरवू पाहणाऱ्या समाजाची पाकिस्तानची मागणी देऊन टाकावी असे डॉ. आंबेडकर म्हणत असतील तर, त्यांना कोणताहि स्वाभिमानी हिंदु असेंच विचारील की, हिंदूंच्या या वृत्तीला शरणागतीच म्हणावे लागणार नाही काय? मुसलमानांशी मिळतें घ्यावयाचें तर तें शरणागतीच्या मार्गाने (Appeasement) घ्यावें की तडजोडीच्या मार्गाने (Settlement) घ्यावे असा मुद्दा डॉ० आंबेडकर यांनी आपल्या ग्रंथाच्या समारोपांत (पृ० ३४७ वर) उपस्थित केला आहे. त्यांनीच मोळा केलेल्या माहितीच्या आधारे त्या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट शब्दांत असें आहे की, आततायीपणा करणाऱ्या लोकांशी मिळते घेण्याचा विचारहि मनांत आणणे हे समाजाच्या अगर राष्ट्राच्या स्वाभिमानाच्या दृष्टीने शक्यच नसल्याने, मुसलमानांशी कोणत्या पद्धतीने मिळतें ध्यावे हा मुद्दाच अप्रस्तुत आहे. । हिंदू व मुसलमान ही दोन भिन्न राष्ट्रे आहेत असे गृहीत धरून मुसलमानांच्या भिन्नत्वाची अगर भिन्न राष्ट्रत्वाची जी मीमांसा डॉ. आंबेडकर यांनी केली आहे तिचे स्वरूप कसें सदोष आहे हे या विवेचनावरून स्पष्ट होईल. हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती, पारशी वगैरे सर्वांची जूट घडवून आणण्याची गांधीजींची महत्त्वाकांक्षा, हिवाळयांत सकाळी दिसणाऱ्या धुक्याप्रमाणे, गेल्या वीस वर्षांच्या काळांत हळुहळू पार विरून गेली आहे. अशा परिस्थितीत विचार शिल्लक उरतो तो एकच ! ..