पान:निर्माणपर्व.pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ती पूर्ण झालेली असली तर शेवटी, दहा-वीस वर्षातून केव्हातरी, एखादा संधीचा क्षण येतच असतो. तो पकडण्याची जागरुकताही ठेवावी लागते. नेतृत्वाचा घटक महत्त्वाचा व निर्णायक ठरतो तो विशेषतः या टोकाच्यावेळी. गरूड आणि घार यातील फरक याक्षणी स्पष्ट होऊन जातो. हिंदुस्थानातील कम्युनिस्टांना असा एकही गरूड पन्नास वर्षात लाभलेला नाही हे खरे त्यांचे दुर्दैव आहे.

 अर्थात हे सगळे आज तरी स्वप्नरंजन आहे. कुणीच अशी गरूडझेप आपल्याकडे घेतलेली नाही, घेण्याची कुणाची तयारीही दिसत नाही. पण जर खरोखरच मुळापासून बदल हवा असेल, चालू परिस्थिती असह्य वाटत असेल तर अशी काही थक्क करणारी व वरवर पहाता परस्परविरोधी वाटणारी झेप, बदल करू म्हणणाऱ्यांनी घ्यायला हवी. जुन्या चाकोऱ्या मोडायला हव्यात. नवीन व्यूह रचले जायला हवेत. डांगे व त्यांचे सहकारी यांच्याजवळ असे व्यूह रचण्याची, नवीन झेप घेण्याची थोडीफार शक्ती एकेकाळी होती असे दिसते. आता मात्र ही शक्यता फारफार दुरावलेली आहे.

ऑक्टोबर १९७४



हिमालयाच्या अलीकडे आणि पलीकडे । ९१