पान:निर्माणपर्व.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उभी होती. त्या ठिकाणी छगन मदन पा (टील) सालदार भाग्या रहा भिल यास खालीलप्रमाणे माहिती सांगत होता.

 माहिती भयानक असल्यामुळे मी तेथे चुपचाप उभी राहिली. छगन मदन पा (टील) बोलत होता, की भाग्याभाई तुम्ही तुमचे पोरसोर घेऊन ताबडतोब विहिरीवर निघून येणे तू माझा दोस्तचा सालदार आहे म्हणून सांगत आहे. एवढ्या दोन-चार दिवसात आम्ही विकत आणलेली पाच लिटर एन्ड्रीन ज्या ज्या विहिरीतील आदिवासी पाणी पितात त्या त्या विहिरीत पाच लिटर एन्ड्रीन टाकणार आहोत. एन्ड्रीन टाकलेवर आमचे विरोधी आमचे दुष्मण आदिवासी समाज त्या विहिरीतील पाणी प्याल्याबरोबर मरणार. नंतर आम्हाला समाधान लाभेल. भाग्याभाई तुम्ही ताबडतोब आज-उद्या तुमचा सामान व सहपरिवार घेऊन जंगलात निघून यावे अशा प्रकारची वार्ता ऐकून मी शेंगा वेचन्याला न जाता ताबडतोब घाईत घरी आली माझ्या नवऱ्याला ही हकीकत सांगितली व नवऱ्याबरोवर शहादे येथे असलेल्या आदिवासी भिल सेवा मंडळचे अध्यक्ष श्री. अंबरसिंग सुरतवंती यांचेकडे स्वखुषीने येऊन हा जबाब लिहून दिला आहे.
 अर्जाखाली अंबरसिंगने आपल्या हस्ताक्षरातील शेरा ओढला.
 '-- योग्य कार्यवाहीसाठी पो. स. इन्स्पेक्टरकडे रवाना -'

५-११-७०



 असे अनेक अर्ज. छळवादाचे, दहशतीचे वेगवेगळे नमुने. भिल्लांच्या -आदिवासींच्या झोपड्यातून धान्य, भांडीकुंडी बळजबरीने काढून आणणे हा तर सर्रास प्रकार. ही सर्व पार्श्वभूमी ध्यानात घेतली तरच कालपरवापर्यंत मवाळ आणि गरीब भासणारा अंबरसिंग एकदम भडकून स्वतंत्र आदिवासी राज्याची मागणी करण्याइतका बेभान का होतो, याचा व्यवस्थित उलगडा करता येतो. मख्यमंत्री मा. वसंतराव नाईक यांना लिहिलेल्या एका पत्रात अंबरसिंगने ही मागणी या सुमारास स्वच्छपणे पुढे मांडलेली आहे, शब्दाशब्दातून त्याचा संताप, त्याची चीड व्यक्त झालेली आहे. अंबरसिंगने मुख्यमंत्र्यांना लिहिले-
 आज वर्षानुवर्ष अन्यायाचा फाशात अडकलेला आदिवासी त्याच फाशात स्वतंत्र काळातही त्याच पदाला जाणून बुजून अडकवला गेला आहे, याची खात्री आपण आपल्या हेरद्वारे घेऊ शकता.

 गेल्या वर्षी पाडळदे बु. ता. शहादे या गावातील आदिवासी भिल हिंदू बाधवावर जो अन्याय व अत्याचार झाला त्या परिस्थितीसाठी आठवण जरी

शहादे । २७