पान:निर्माणपर्व.pdf/230

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

_________________________________________________________________________________

श्रीग्रामायन
बलसागर

या पूर्वीच्या दोन पुस्तकांप्रमाणेच

निर्माणपर्व

या प्रस्तुत पुस्तकाचा विषय आहे
विकसनशील भारत.

एका खळबळजनक कालखंडातील हे चिंतन.
चळवळीतील प्रत्यक्ष सहभागाची पाश्र्वभूमी लाभलेले.
-शहादे चळवळ, जेपींचे बिहार आंदोलन, आणीबाणी,
जनता पक्षप्रयोग, ग्राहकचळवळ, म्हैसाळप्रयोग...


श्रीग्रामायन या पुस्तकाबद्दल एका तरुण वाचकाने
लिहिले होते - ‘ग्रामीण भारताच्या वाटांचा शोध
घेणाऱ्या कोणाही कार्यकर्त्याला ' श्रीग्रामायन 'मध्ये
रेखाटलेली या ग्रामजीवनाची चित्रं आजच्या काळात
आणि संदर्भात तितकीच ताजी वाटावीत, अशी आहेत.
कदाचित त्यांना वाट पुसतच एखादा पुढली चित्रं चितारू शकेल.'

याच वाचकाने ‘बलसागर'बद्दल लिहिले होते-
‘विविध विचारधारांना खुल्या मनाने
लेखक येथे सामोरा जात आहे. त्यांचे सुस्पष्ट व तर्कसंगत
विश्लेषण येथे आहे आणि आजच्या संदर्भात भारतीय राष्ट्रवादाची
नवी मांडणी करण्याचा प्रयत्नही आहे.'
या पुस्तकात, या 'निर्माण पर्वा'तही हा प्रयत्न आहे,
एक मांडणी आहे.
समन्वयाचे पूर्वसूत्र आणखी पुढे नेले आहे...

_______________________________________________________________________________________